मुंबई : मध्य रेल्वे १५ आॅक्टोबरपासून ३ वातानुकूलित विशेष गाड्या चालविणार आहे. त्या पूर्णपणे आरक्षित असतील.लोकमान्य टिळक टर्मिनस-हरिद्वार वातानुकूलित द्वि-साप्ताहिक विशेष १५ आॅक्टोबरपासून पुढील सूचना मिळेपर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर सोमवार व गुरुवारी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी हरिद्वारला पोहोचेल, तर हरिद्वार येथून ती १६ आॅक्टोबरपासून दर मंगळवार व शुक्रवारी सुटेल.लोकमान्य टिळक टर्मिनस-लखनौ वातानुकूलित साप्ताहिक विशेष १८ आॅक्टोबरपासून दर शनिवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल. लखनऊ येथून ती १८ आॅक्टोबरपासून दर रविवारी सुटेल. नागपूर-अमृतसर वातानुकूलित साप्ताहिक विशेष १७ आॅक्टोबरपासून दर शनिवारी नागपूरहून सुटेल. अमृतसरवरून ती १९ आॅक्टोबरपासून दर सोमवारी सुटेल.या सर्व वातानुकूलित एक्स्प्रेसचे थांबे आणि वेळ नियमित वातानुकूलित एक्स्प्रेसप्रमाणेच असेल.
मध्य रेल्वे चालविणार विशेष वातानुकूलित गाड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 03:41 IST