Join us  

मुख्यमंत्रिपदावरून सेना-भाजप युतीत खदखद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 8:01 AM

मुंबई : लोकसभेसाठी भाजपशी युती करताना विधानसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्रीपद निर्माण करायचे व अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद घ्यायचे असे ठरलेले आहे. ...

मुंबई : लोकसभेसाठी भाजपशी युती करताना विधानसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्रीपद निर्माण करायचे व अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद घ्यायचे असे ठरलेले आहे. मात्र भाजपचे मंत्री वेगवेगळे मुद्दे पुढे करत आहेत. महाराष्टÑात अजूनही आम्हीच मोठे भाऊ आहोत हे भाजपने विसरु नये, असे शिवसेनेच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने सांगितले.

भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्टÑात मुख्यमंत्री भाजपचाच असेल, असे सांगितले. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही पुनरुच्चार केला. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप-शिवसेनेने प्रत्येकी १३५/१३५ जागा लढवायच्या आणि बाकीच्या जागा मित्रपक्षांना द्यायच्या, असा फॉर्म्युला जाहीर केला. नेत्यांच्या या वक्तव्यानंतर युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी टिष्ट्वट करत ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या बैठकीत अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला आहे. या बैठकीत हजर नसणाऱ्यांनी व्यक्तिगत स्वार्थासाठी युतीतील वातावरण बिघडवू नये.’ सरदेसाई यांच्या या टिष्ट्वटवर शिवसेनेकडून कोणीही अधिकृत भाष्य केलेले नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, याचे नियोजन सुरू केले आहे. भाजपला विजय मिळू शकणाºया पण शिवसेनेकडे असलेल्या जागांवर अपक्ष म्हणून किंवा मित्रपक्षाच्या नावाखाली अन्य उमेदवारांना निवडून आणायचे व नंतर त्यांना भाजपमध्ये घ्यायचे, असा हा ‘गेम प्लॅन’ असल्याचे समजते.

टॅग्स :शिवसेनाउद्धव ठाकरे