पावसाचा जोर ओसरल्याने नागरिकांना दिलासा
By Admin | Updated: June 20, 2015 23:23 IST2015-06-20T23:23:02+5:302015-06-20T23:23:02+5:30
जिल्ह्याला शुक्रवारी पावसाने चांगले झोडपल्यानंतर शनिवारी मात्र, वेधशाळेचा अंदाज खोटा ठरवून पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतल्याचे दिसते.

पावसाचा जोर ओसरल्याने नागरिकांना दिलासा
ठाणे : जिल्ह्याला शुक्रवारी पावसाने चांगले झोडपल्यानंतर शनिवारी मात्र, वेधशाळेचा अंदाज खोटा ठरवून पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतल्याचे दिसते. त्यामुळे ठाणेकरांनाही दिलासा मिळाला. जिल्ह्यात मागील चोवीस तासात सरासरी १०.०५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत ठाणे तालुक्यात सर्वाधिक १७.७४ मीमी पाऊस झाला आहे. कुठेच दुर्घटना झाली नसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या सूत्रांनी सांगितले.
ठाणे महापालिका हद्दीत २४ झाडे उन्मळून पडली असून १६ ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याच्या तक्रारी ठामपा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे आल्या होत्या.
जिल्ह्यात शुक्रवारी ४९८ मीमी एवढा पाऊस झाल्यानंतर पुढील २४ तासात आणखी मुसळधार पावसाची शक्यता वेध शाळेने वर्तवली होती. मात्र,तसा पाऊस झालाच कुठेच झाला नाही. शनिवारी जिल्ह्यात ७०.२७ मीमी पावसाची नोंद झाली आहे. यात ठाण्यात १७.७४, कल्याण १०.८१, मुरबाड ४.८४, उल्हासनगर ११.६६, अंबरनाथ ८.८१, भिवंडी १०.७८ तर शहापुरात ५.६७ पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. सायंकाळनंतर पुन्हा पावसाने जोर धरल्याचे दिसले.
दरम्यान, ठाणे शहरात ३३.५० मीमी पाऊस झाला आहे. १६ सखल भागात पाणी साचले असून इतर १९ अशा एकूण ७४ तक्रारी चोवीस तासात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. (प्रतिनिधी)
कल्याण-डोंबिवलीत जनजीवन सुरळीत
शुक्रवारी मध्यरात्रीपासून कल्याण-डोंबिवलीकरांचे जनजीवन विस्कळीत केले होते. मात्र, शनिवारी सकाळपासूनच पावसाच्या हलक्या सरींनी ते पुन्हा पूर्वपदावर येऊन नित्याचे व्यवहार सुरु झाल्याचे निदर्शनास आले. सकाळी साडेसातच्या सुमारास महापालिका क्षेत्रात पावसाच्या हलक्या सरींनी दिवसभर संततधार राहणार असे वाटत असतांनाच त्यानंतर दुपारी एक वाजेपर्यंत मात्र पावसाने विश्रांती घेतली होती.