समुद्र जैवविविधतेचा प्रश्न ऐरणीवर

By Admin | Updated: July 14, 2014 23:57 IST2014-07-14T23:57:58+5:302014-07-14T23:57:58+5:30

डहाणूतील समुद्रकिनारा कासव व डॉल्फिनकरिता नंदनवन आहे. अवैध रेती उपसा, मासेमारी पद्धती, प्लास्टीक -पॉलिथिनचा विळखा, अविवेकी पर्यटक, शासकीय धोरण आदीमुळे अमूल्य ठेवा धोकादायक बनत आहे

The question of sea biodiversity on the anvil | समुद्र जैवविविधतेचा प्रश्न ऐरणीवर

समुद्र जैवविविधतेचा प्रश्न ऐरणीवर

अनिरुध्द पाटील, बोर्डी
डहाणूतील समुद्रकिनारा कासव व डॉल्फिनकरिता नंदनवन आहे. अवैध रेती उपसा, मासेमारी पद्धती, प्लास्टीक -पॉलिथिनचा विळखा, अविवेकी पर्यटक, शासकीय धोरण आदीमुळे अमूल्य ठेवा धोकादायक बनत आहे. जखमी समुद्री कासवांची संख्या वाढत आहे. चिखले गावातील विद्यार्थ्यांनी जखमी कासवाला वन विभागाला सुपूर्द केले. संंरक्षित क्षेत्र घोषित करण्याची मागणी जोर धरत आहे.
डहाणू तालुक्यातील ३५ किमी लांबीचा किनारा समुद्र जैवविविधतेचा खजिना आहे. कांदळवन, समुद्रीगवत, खडक, किनाऱ्यावरील वेली सुरू बागा हे नैसर्गिक संरक्षण प्राप्त आहे. डॉल्फिन दर्शनासह विविध माशांच्या प्रजाती आहेत. रेतीच्या आगाराने आॅलिव्ह रिडले, ग्रीन टर्टल, हॉक्सबील, लेदरबॅक समुद्रीकासवांचा अधिवास आहे. विणीच्या हंगामात किनारा गाठणाऱ्या कासवांची परंपरा अनेक वर्षांची आहे. स्थानिक जनता व मच्छीमारांना कासवांबाबत माहिती आहे. विणी हंगामाचे न चुकणारे पारंपरिक अंदाज आहेत. त्यांना देव मानण्याची प्रथा आजही प्रचलित असल्याने धोका पोहचविणारे गैरवर्तनाचे प्रकार येथे घडत नाहीत. चिखले समुद्रकिनारी हर्ष किणी, मनीष पाटील, आकाश आगरी, धनेश जोंधळेकर या शाळकरी विद्यार्थ्यांनी जखमी कासव वन विभागाला सुपूर्द करून प्रत्यय दिला.

Web Title: The question of sea biodiversity on the anvil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.