भाज्यांचे भाव कडाडले
By Admin | Updated: June 24, 2015 00:02 IST2015-06-24T00:02:32+5:302015-06-24T00:02:32+5:30
पावसाच्या वाढत्या जोरामुळे ४ ते ५ दिवसांपासून वाहतुकीत, साठवणूकीत व विक्रीसाठी असलेल्या कोथिंबीर तसेच पालेभाज्या व फळभाज्या सडल्यामुळे काही ठिकाणी त्या

भाज्यांचे भाव कडाडले
पावसाच्या वाढत्या जोरामुळे ४ ते ५ दिवसांपासून वाहतुकीत, साठवणूकीत व विक्रीसाठी असलेल्या कोथिंबीर तसेच पालेभाज्या व फळभाज्या सडल्यामुळे काही ठिकाणी त्या अक्षरश: फेकून द्याव्या लागल्या आहेत. भाज्यांची आवक एकीकडे कमी झाली तर दुसरीकडे असलेल्या भाज्या सडल्यामुळे त्यांचे भाव कडाडले आहेत. तसेच कोथिंबीर अधिक खराब झाल्याने तिची एक जुडी ८०-९० रुपयाला मिळते आहे. ही स्थिती आणखी पंधरा दिवस कायम राहू शकते. अशी माहिती भाजीविक्रेत्यांनी दिली.