Join us

प्रत्युषाच्या जोडीदाराने तिचे आयुष्य नरक बनवले!, न्यायालयाने राहुलराजचा अर्ज फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 10:03 IST

२०१६ मध्ये ‘बालिका वधू’ फेम २४ वर्षीय अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने आत्महत्या केली.

मुंबई : अभिनेता राहुलराज सिंहच्या छळामुळे प्रत्युषाला आत्महत्येचा विचार करण्यास भाग पाडले. आरोपीने पीडितेचा शारीरिक, भावनिक आणि आर्थिक छळ केला, इतकेच काय तर शोषणही केले. त्याने तिचे आयुष्य जिवंतपणी नरक बनवले, असे निरीक्षण नोंदवत निर्दोष मुक्ततेच्या मागणीसाठी राहुलराज सिंहने केलेला अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला.

२०१६ मध्ये ‘बालिका वधू’ फेम २४ वर्षीय अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने आत्महत्या केली. तिचा जोडीदार राहुलराज सिंह हा आत्महत्येस जबाबदार असल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. २ जुलै २०१६ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने राहुलराजचा अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्यानंतर दोषमुक्ततेसाठी राहुलने अर्ज केला. प्रत्युषाच्या पालकांनी त्याला आव्हान दिले. राहुलराज दोषी आढळल्याचे निदर्शनास येताच सत्र न्यायालयाने १४ ऑगस्ट रोजी त्याचा जामीन अर्ज फेटाळला. 

आदेशात काय म्हटले आहे?     सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. जे. अन्सारी यांनी आदेशात म्हटले आहे की, आरोपीने प्रत्युषाचे जगणे मुश्कील केले होते. त्यामुळे प्रत्युषा नैराश्याच्या अवस्थेत पोहोचली होती.      प्रथम दर्शनी पुरावे या वस्तुस्थितीकडे लक्ष वेधतात की, राहुलने तिचे दुःख कमी करण्यासाठी कोणतीही पावले उचलली नाहीत, मात्र, त्याच्या कृतीने प्रत्युषाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले.      तिची मन:स्थिती योग्य नसतानादेखील आरोपीने तिला अमली पदार्थ देऊ केले, इतकेच काय तर साक्षीदाराच्या म्हणण्यानुसार प्रत्युषाला जबरदस्तीने मद्यदेखील पाजले.

टॅग्स :न्यायालय