आवारात कच-याचे ढीग
By Admin | Updated: August 3, 2014 23:46 IST2014-08-03T23:46:44+5:302014-08-03T23:46:44+5:30
पालघर जिल्ह्याचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले

आवारात कच-याचे ढीग
मनोर : पालघर जिल्ह्याचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले, मात्र महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने १ आॅगस्टपासून बेमुदत संप पुकारल्याने पालघर तहसील कार्यालय ओस पडले असून दाखल्यांअभावी शाळकरी विद्यार्थी तसेच ग्रामस्थांचे प्रचंड हाल झाले. तसेच आवारात कचऱ्याचे ढिगारे त्यामध्ये तिरंगा झेंडेही दिसत होते. कचराही साठला होता.
क्लार्क, लिपिक तसेच नायब तहसीलदार व इतर कर्मचाऱ्यांचे महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने पुकारलेल्या बेमुदत संपामुळे पालघर तहसील कार्यालयात विविध शासकीय कामे बंद पडलेली दिसत होती. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळकरी विद्यार्थी यांना दाखले मिळाले नाहीत तसेच शेतकऱ्यांचे कागदोपत्री अनेक कामे रखडली. त्यांना रिकाम्या हाती परतावे लागले.
पालघर तहसील कार्यालयाच्या आवारात कचऱ्याचे ढिगारे साचले होते. तिरंगा झेंडेही कचऱ्याच्या ढिगाऱ्यात दिसत होते. तसेच तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या बाजूला एक डस्टबीन होते. त्यामध्ये कचरा तसाच पडून होता. कचऱ्यासोबत मद्याची रिकामी बाटलीही दिसत होती. एका बाजूला कामासाठी आलेले लोक रिकाम्या हाती आपापल्या घरी परतताना दिसत होते. बेमुदत संपाचे कारण शासनाने मंजूर केलेले सर्क्युलर पास न केल्याने तसेच नायब तहसीलदारांचे कार्य करणाऱ्याला अव्वल कारकुनाचे वेतन मिळते, असे मागण्यांसाठी उपोषण सुरु होते.