पनवेलच्या जलवाहिन्यांना फुटीचे ग्रहण
By Admin | Updated: November 28, 2014 22:40 IST2014-11-28T22:40:20+5:302014-11-28T22:40:20+5:30
झोपडपट्टीधारकांकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीची तोडफोड करण्यात येत असल्याचे प्रकार पनवेल तालुक्यात मोठय़ा प्रमाणात वाढले आहेत.

पनवेलच्या जलवाहिन्यांना फुटीचे ग्रहण
प्रशांत शेडगे ल्ल पनवेल
झोपडपट्टीधारकांकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीची तोडफोड करण्यात येत असल्याचे प्रकार पनवेल तालुक्यात मोठय़ा प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे या वाहिनीला फुटीचे ग्रहण लागून लाखो लीटर पाणी वाया जात आहे. या प्रकारामुळे एमजेपी अधिकारी आणि कर्मचारीही त्रस्त झाले असून रोज नवनवीन ठिकाणी जलवाहिनी फुटत आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात पाणी गळती होत असून जलवाहिन्या बदलण्याचा प्रस्ताव शासन दरबारी धूळखात पडला आहे.
जीवन प्राधिकरणाच्या भोकरपाडा येथील जवाहरलाल नेहरू शुद्धीकरण केंद्र ते जेएनपीटी व पनवेल या दरम्यान 28 वर्षापूर्वी 115 एमएलडी क्षमतेची जलवाहिनी टाकण्यात आली होती. या वाहिनीद्वारे पनवेल शहर, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, कामोठे, खारघर व आजूबाजूच्या 19 गावातील सुमारे 15 लाख रहिवाशांना पाणीपुरवठा केला जातो. त्याचबरोबर पळस्पे फाटा येथून टी पॉइंट काढून जेएनपीटीलाही पाणी दिले जाते. आजूबाजूची गावेही यावर अवलंबून आहेत. परंतु ही वाहिनी जुनाट होवून ठिकठिकाणी गंजली आहेत. परिणामी पाण्याच्या दाबाने ती वारंवार फुटत आहे. या जलवाहिनीलगत वसलेल्या झोपडपट्टीवासीयांकडून अनेक ठिकाणी जलवाहिनी फोडत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.
आसूडगाव, भिंगारी, पोदी, नवीन पनवेल, करंजाडे, वडघर बंबईचा पाडा या ठिकाणी जलवाहिनी फोडली जात आहे. त्या ठिकाणी वारंवार मलमपट्टी केली तरी दुस:या दिवशी जलवाहिनी फोडली जात आहे. त्यापैकी आसूडगाव, करंजाडे येथील प्रश्न अधिक जटील बनला आहे. इतर ठिकाणीही परिस्थिती फारशी वेगळी नसून दररोज लाखो लीटर पाण्याची गळती होत आहे.