वाहतूक शाखेच्या उपशाखांची संख्या झाली २३
By Admin | Updated: June 6, 2015 23:09 IST2015-06-06T23:09:22+5:302015-06-06T23:09:22+5:30
वर्षभरातच ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेत आणखी एक उपशाखा सुरू करण्याचा निर्णय शहर पोलिसांनी घेतला आहे. त्यानुसार, लवकरच

वाहतूक शाखेच्या उपशाखांची संख्या झाली २३
ठाणे : वर्षभरातच ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेत आणखी एक उपशाखा सुरू करण्याचा निर्णय शहर पोलिसांनी घेतला आहे. त्यानुसार, लवकरच पारसिकनगर या नावाने कळवा आणि मुंब्य्राच्या सीमेवर ती सुरू होणार आहे. यामुळे वाहतूकशाखेच्या उपशाखांची संख्या २३ होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात वाहतूक नियंत्रण शाखेच्या माध्यमातून जुलै २०१४ पर्यंत १९ उपशाखा कार्यरत होत्या. आणखी ६ उपशाखा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने त्या वेळी ही संख्या २२ वर पोहोचली. या उपशाखांद्वारे ठाणे शहरासह कल्याण, डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर या शहरांसह आजूबाजूच्या परिसरांत वाहतुकीचे नियमन केले जाते. यात वारंवार नियम मोडणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई क रण्यात येते.
मध्यंतरी सुरू झालेल्या उपशाखा
ठाणे शहरात राबोडी
आणि वर्तकनगर तर कल्याणात मानपाडा आणि खडकपाडा तसेच उल्हासनगर विठ्ठलवाडी उपशाखा सुरू झाल्या आहेत.
संख्याबळ १० ते २५
त्या उपशाखांच्या लहान-मोठ्या हद्दीनुसार १० ते २५ असे मनुष्यबळ तेथे कार्यरत आहे. यामध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मदतीला पोलीस शिपाई आहेत.
लवकरच सुरू होणार...
मनुष्यबळ कमी असल्याने आणि सध्या सुरू असलेल्या बदली प्रक्रिया पार पडल्यावर पारसिकनगर उपशाखा लवकरच सुरू होणार आहे.
त्यातच आता कळवा-मुंब्रा परिसरात दिवसेंदिवस वाढत्या नागरीकरणामुळे वाहनांची संख्याही वाढल्याने तेथे वाहतूक नियंत्रित ठेवणे पोलिसांना भविष्यात मोठी डोकेदुखी होऊ शकते. हे ओळखून नियमांचे उल्लघंन करण्यांवर वचक राखण्यासाठी ही उपशाखा सुरू करण्याचा निर्णय ठाणे पोलिसांनी घेतला. तिचा कारभार मुंब्रा, रेतीबंदर येथील चौकीच्या ठिकाणावरून चालविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.