ऐन भात पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना नोटिसा
By Admin | Updated: June 12, 2014 01:46 IST2014-06-12T01:46:38+5:302014-06-12T01:46:38+5:30
कल्याण तालुक्यात सहा हजार ५९२ हेक्टर क्षेत्रावर भात पिक घेतले जाते. प्रथम तालुक्यातून गेल इंडियाची पाईप लाईन खोदून नेण्यात आली

ऐन भात पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना नोटिसा
वरपगाव : भात लागवडी योग्य जमीनीतून गॅस पाईपलाईन घेऊन शेतकऱ्यांची हजारो झाडे तोडून केवळ शेतकऱ्यांनी रिलायन्स कंपनीच्या पाण्याच्या पाईप लाईनवरून नळ कनेक्शन घेतल्याने कंपनीने पोलिसांच्या मदतीने शेतकऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देऊन त्यांच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे तीव्र संताप पसरला आहे.
कल्याण तालुक्यात सहा हजार ५९२ हेक्टर क्षेत्रावर भात पिक घेतले जाते. प्रथम तालुक्यातून गेल इंडियाची पाईप लाईन खोदून नेण्यात आली. त्यामुळे म्हसकळ, आवटी, रायता, घोटसई, मानिवली, मोहिली, फळेगाव, उशिद आदी गावातील हजारो एकर शेती बाधीत झाली. त्यांना अद्याप नुकसान भरपाईही मिळाली नाही. तोच तालुक्याच्या वाहोली गावाजवळ रिलायन्स गॅस ट्रान्सपोर्टेशन इन्फ्रास्ट्रक्चर लि. कंपनीचे कॉम्प्रेसर स्टेशन २००८ मध्ये उभारण्यात आले. यातील कर्मचाऱ्यांच्या प्रयोजनासाठी मिलाच्या उपयोगासाठी पाणीपुरवठा व्हावा या हेतूने बारवी नदीतून मांजर्ली येथून पाईपलाईन मार्गे पाणी आणण््यात आले.
ही पाईपलाईन करताना मांजर्ली, वाहोली येथील सुमारे ११ शेतकऱ्यांची शेतजमीन बाधित झाली. यामध्ये सर्वाधिक फटका मांजर्लीच्या बारकू जानू घारे या शेतकऱ्याला बसला. त्याची भात लागवड योग्य जमीन पुरती नष्ट झाली. या शिवाय त्यांच्या इतर जमीनीवरील सुमारे ४० झाडे कंपनीने तोडली. त्यामध्ये बांबू, पळस, आशी, भोकर, आईन, धामण, सावर, मोह, फलारी, बेला, साग, खैर, कुडा, आंबा या झाडांचा समावेश होता. उध्वस्त झालेली झाडे व नष्ट होत असलेली शेती या धक्क्याने बारकू भारे
या शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
(वार्ताहर)