राष्ट्रवादीचे पानिपत

By Admin | Updated: May 17, 2014 01:50 IST2014-05-17T01:50:46+5:302014-05-17T01:50:46+5:30

उल्हासनगरमधील सर्वच सिंधी मतदान एकगठ्ठा आपल्याला होईल, अशा भ्रमात राष्ट्रवादी होता. त्याचा हा निरास जनतेने दूर केला. बदलापूर, अंबरनाथ येथे आघाडीने दुर्लक्ष केले तर तिथे युतीने जोर लावला.

NCP's Panipat | राष्ट्रवादीचे पानिपत

राष्ट्रवादीचे पानिपत

ठाणे : २००९च्या लोकसभा निवडणुकीत दबंगगिरी आणि कास्टकार्ड खेळून संजीव नाईकांचा घडविलेला विजय व निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे असंतुष्ट खासदार आनंद परांजपे यांना आपल्या दावणीला बांधण्याची घडविलेली कामगिरी याच्या जोरावर ठाणे, कल्याणला आपला बालेकिल्ला बनविण्याचे राष्ट्रवादीचे मनसुबे मतदारांनी या दोघांनाही पराभूत करून धुळीस मिळविले. खरे तर आनंद परांजपे यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीत प्रचंड विरोध होता. या मतदारसंघात ब्राह्मणांची फारशी मते नसताना व परांजपे हे पक्षात अगदी अलीकडे आलेले असताना त्यांना दिलेली उमेदवारी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि स्थानिक नेत्यांना अजिबात पसंत नव्हती. त्यात राष्ट्रवादी पुरस्कृत आमदार गणपत गायकवाड यांनी तिला जाहीर विरोध केला होता. तरीही परांजपेंची उमेदवारी कायम ठेवल्यामुळे राष्ट्रवादीत नाराजी होतीच. राष्ट्रवादीला कल्याणमध्ये अति आत्मविश्वास नडला. कळवा आणि मुंब्रा इथे प्रचाराला कुणीही येऊ नका़ मी इथली एकगठ्ठा मते परांजपेंना मिळवून देतो, अशी घमेंड येथील आमदार व राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी मारली होती. तीही मतदारांनी ठेचून काढली. उल्हासनगरमधील सर्वच सिंधी मतदान एकगठ्ठा आपल्याला होईल, अशा भ्रमात राष्ट्रवादी होता. त्याचा हा निरास जनतेने दूर केला. बदलापूर, अंबरनाथ येथे आघाडीने दुर्लक्ष केले तर तिथे युतीने जोर लावला. त्याचा फायदा युतीला कल्याणमध्ये मिळाला. ठाण्यामध्ये राष्ट्रवादीच्या अध्यक्षांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळ््यांनी सभांचा धडाका लावला; परंतु त्याला मतदारांनी किंमत दिली नाही, हेही या पराभवावरून स्पष्ट झाले.

Web Title: NCP's Panipat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.