मुंबई-सुरत रिंग रोड टनेल उभारणार
By Admin | Updated: December 14, 2014 01:58 IST2014-12-14T01:58:42+5:302014-12-14T01:58:42+5:30
मुंबई ते सुरतदरम्यान रिंग रोड टनेल प्रकल्प उभारण्यासाठी लवकरच सल्लागारांची नेमणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
मुंबई-सुरत रिंग रोड टनेल उभारणार
मुंबई : तब्बल 9क् हजार कोटींचा मुंबई ते सुरतदरम्यान रिंग रोड टनेल प्रकल्प उभारण्यासाठी लवकरच सल्लागारांची नेमणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ब्रिज इंजिनीअर्सच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमादरम्यान नितीन गडकरी बोलत होते. या वेळी रेल्वे इंजिनीअरिंग बोर्डाचे सभासद व्ही. के. गुप्ता, संचालक व खास सचिव (रस्ते विकास) एस.एन. दास व आयआयबीआयचे संस्थापक माधवराव भिडे आणि अध्यक्ष व्ही.के. अग्निहोत्री उपस्थित होते.
नितीन गडकरी म्हणाले, वांद्रे-वरळी सागरी पुलामुळे समुद्राचे सौंदर्य हरपले. त्यामुळे आता भुयारी मार्ग बांधून दोन शहरे जोडण्याचा विचार आहे. राज्याचा सार्वजनिक बांधकाम मंत्री असतानाच्या काळात अहमदाबाद-मुंबई द्रुतगती महामार्ग उभारायचे होते; पण तेव्हा ते शक्य झाले नाही. त्यामुळेच आता
सुरत ते मुंबई भुयारी मार्गासाठी विचारविनिमय सुरू आहे. त्यासाठी अंदाजे 9क् हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गाच्या कामासाठी लागणारी कच्ची सामग्री तयार करण्याचा कारखाना अलिबाग येथे उभारल्यास त्याची समुद्रमार्गे वाहतूक करून खर्चात 3क् हजार कोटींची बचत होईल. देशातील 1क् मोस्ट आउटस्टेडिंग ब्रिज नॅशनल पुरस्कार प्राप्त ब्रिज इंजिनीअर्सचा नितीन गडकरी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. शिवाय आयआयबीआयच्या ‘ब्रिज इंजिनीअरिंग’ या मासिकाचे प्रकाशनही करण्यात आले. (प्रतिनिधी)
भारतात दरवर्षी पाच लाख रस्ते अपघात होतात. त्यात ट्राफिकची समस्यासुद्धा आहे. यावर उपाय म्हणून मुंबईत जमिनीवर व पाण्यात दोन्ही ठिकाणी चालणारी ‘डक बस’ सुरू करण्यात येणार आहे. येत्या काही महिन्यांत ही बस प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येईल. ही बस रस्त्याबरोबरच समुद्रावर चालत असल्याने प्रवाशांना आपली वाहतुकीची साधने बदलण्याची गरज भासणार नाही.