मोबाइल चोरट्यांना ‘ब्रेक’
By Admin | Updated: May 31, 2014 01:33 IST2014-05-31T01:33:58+5:302014-05-31T01:33:58+5:30
ठाणे घोडबंदर रोड मार्गावर मीरा रोड आणि बोरीवली धावणार्या बेस्ट, टीएमटी, व्हीव्हीएमटी आणि एसटी बसेसमध्ये सुसाट सुटलेल्या मोबाइल चोरट्यांना ठाणे पोलिसांनी‘ब्रेक’ लावला आहे

मोबाइल चोरट्यांना ‘ब्रेक’
पंकज रोडेकर, ठाणे - घोडबंदर रोड मार्गावर मीरा रोड आणि बोरीवली धावणार्या बेस्ट, टीएमटी, व्हीव्हीएमटी आणि एसटी बसेसमध्ये सुसाट सुटलेल्या मोबाइल चोरट्यांना ठाणे पोलिसांनी‘ब्रेक’ लावला आहे. याप्रकरणी मुंबईतील दोन टोळ्यांना गजाआड करण्यात आले आहे. हे चोरटे मौजमजा करण्यासाठी मोबाइल लांबवत असत़ या टोळ्या पकडल्याने काही प्रमाणात मोबाइल चोरीचे प्रमाण कमी झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या टोळ्या बेस्ट बसमधील प्रवाशांना प्रामुख्याने टार्गेट केले होते. ठाण्यातून घोडबंदर रोडवरून ३५ मिनिटांत बोरीवली गाठता येत असल्याने नागरिकांचा या मार्गावरून जाणार्या बसेसकडे कल वाढला आहे. त्यामुळे येथून धावणार्या बेस्ट, टीएमटी-एसटी बसेसमध्ये प्रवाशांची गर्दी वाढत आहे. याचा फायदा उचलून मुंबईतील गोवंडी आणि भांडुपमधील दोन टोळ्या या सुसाट निघाल्याने या बसेसमध्ये मागील काही महिन्यांपासून मोबाइल चोरीच्या तक्रारी वाढल्या आहेत. याच दरम्यान, कापूरबावडी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कदम यांच्या पथकाने सलीम अब्दुल शेख (२६), फिरोज शेख (२९), नुरालाई ऊर्फ छोटू शेख (२५), रहिम कादर शेख (५५), शंकर कांबळे (३१) या गोवंडीतील टोळीचे तर भांडुपमधील अनिल जाधव (३५), अजय जाधव (२६), रामू गायकवाड (४०) या दोन टोळ्यांमधील आठ जणांना जेरबंद केले आहे. त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली असून त्यांच्याकडून लाखो रुपयांचे सहा मोबाइल हस्तगत केल्याची माहिती कापूरबावडीचे सहायक पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी दिली. या टोळ्या मोबाइलमधील ‘आयएनइआय’ नंबर बदलून चोरलेले मोबाइल विकत असावेत. तसेच या टोळ्यांना अटक केल्यानंतर सध्यातरी या चोरीचे प्रकार कमी झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.