मुंबई विमानतळावर एक मोठी दुर्घटना टळली. बँकॉकहून मुंबईला येणारे इंडिगो एअरबस A321 हे विमान लँडिंग दरम्यान धावपट्टीवर आदळले. ही घटना आज शनिवारी घडली. थोडक्यात हा अपघात टळला.
ही घटना पहाटे ३.०६ वाजता धावपट्टी २७ वर घडली. खराब हवामान आणि मुसळधार पावसात विमानाचा खालचा भाग धावपट्टीवर आदळला. या घटनेत विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत. यानंतर, पुन्हा लँडिंगचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये लँडिंग यशस्वीरित्या पूर्ण झाले.
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
DGCA चौकशी करणार
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "आम्ही या प्रकरणाची औपचारिक चौकशी करू आणि लवकरच आदेश जारी केला जाईल." घटनेनंतर विमानाला ग्राउंड करण्यात आले आहे आणि संपूर्ण चौकशी आणि दुरुस्तीनंतरच पुन्हा उड्डाण करण्याची परवानगी दिली जाणार आहे.
अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की ही घटना खराब हवामानामुळे घडली. तथापि, आश्चर्याची गोष्ट म्हणजे, एअरलाइन किंवा क्रूने याबद्दल एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) ला तात्काळ माहिती दिली नाही.
इंडिगोचे निवेदन
याबाबत इंडिगोने एक निवेदन जारी केले. 'प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही प्राथमिकता आहे आणि कंपनी सर्व आवश्यक तपासणी आणि दुरुस्ती केल्यानंतरच विमान पुन्हा सेवेत आणेल, असं यामध्ये म्हटले आहे.
मुंबईत मुसळधार पाऊस
मुंबईत सततच्या पावसामुळे हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला. गेल्या २४ तासांत किमान १४ विमानांना विमानतळावर फिरावे लागले, या विमानांना उतरण्याऐवजी त्यांना पुन्हा चक्कर मारून उतरवावे लागले.