लाटांच्या तडाख्यात उत्तनच्या बोटीचे नुकसान
By Admin | Updated: June 10, 2015 02:29 IST2015-06-10T02:29:04+5:302015-06-10T02:29:04+5:30
समुद्रात उसळलेल्या लाटांच्या तडाख्यात उत्तनच्या पातानबंदरात नांगरलेल्या बोटीचा पुढील भाग तुटुन समुद्रात वाहून गेला आहे.

लाटांच्या तडाख्यात उत्तनच्या बोटीचे नुकसान
भार्इंदर : संभाव्य अशोबा चक्रीवादळ अरबी समुद्रात घोंगावत तो पश्चिम किनारपट्टीवर धडकणार असल्याचे भाकीत करण्यात येत असतानाच समुद्रात उसळलेल्या लाटांच्या तडाख्यात उत्तनच्या पातानबंदरात नांगरलेल्या बोटीचा पुढील भाग तुटुन समुद्रात वाहून गेला आहे.
अशोबा चक्चीवादळ पश्चिम किनारपट्टीवर धडकणार असल्याची माहिती वेधशाळेने दिल्याने मच्छिमारांना उसळलेल्या लाटांमुळे बोटी किनाऱ्यााबाहेर घेता न आल्याने त्यांनी त्या किनाय््राातच नांगरल्या. त्यांच्या तडाख्यात उत्तन येथील मच्छिमार आॅस्टीन नून यांची एलिशा नामक बोटीचा पुढील अर्धा भाग पूर्णत: तुटुन समुद्रात वाहुन गेला आहे. बोटीचे सुमारे ४ लाख रु. चे आर्थिक नुकसान झाले आहे.
या दुर्घटनेनंतर त्यांनी स्थानिकांच्या सहकार्याने बोटीला किनाय््राावर आणले आणले असून घटनेची माहिती मत्स्य विभागाला दिली आहे. परंतु, बोटीच्या पंचनाम्यासाठी मत्स्य विभागाकडून अद्याप कोणीही आले नसल्याचे त्यांनी सांगितले.