लोकमत व्हिजन एमबीएला भरघोस प्रतिसाद
By Admin | Updated: March 11, 2015 01:23 IST2015-03-11T01:23:22+5:302015-03-11T01:23:22+5:30
: एमबीए अभ्यासक्रमाच्या टअऌ-उएळ 2015 प्रवेश परीक्षेसाठी मार्गदर्शकांकडून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी

लोकमत व्हिजन एमबीएला भरघोस प्रतिसाद
मुंबई : एमबीए अभ्यासक्रमाच्या टअऌ-उएळ 2015 प्रवेश परीक्षेसाठी मार्गदर्शकांकडून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी ‘व्हिजन एमबीए २०१५’ आयोजित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना या परिसंवादातून अधिक अचूक माहिती व सल्ला मिळत असल्याने दुसऱ्या व तिसऱ्या दिवशीही त्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला. ‘लोकमत’ व ‘कोहिनूर बिझनेस स्कूल’ (केबीएस) यांच्या संयुक्त विद्यमाने या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
दुसऱ्या दिवशी दादर येथील धुरू हॉल येथे पार पडलेल्या परिसंवादात जवळपास शंभर विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. या परीक्षेत यशस्वी कसे व्हायचे, अधिकाधिक गुण संपन्न कसे करावेत, लेखी परीक्षेत
गुणांची टक्केवारी कशी वाढवावी याविषयी मार्गदर्शन करण्यात
आले.
या परीक्षेत १५० हून अधिक गुण मिळवून मेरीटमध्ये आल्यास पसंतीच्या एमबीए अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. यासाठीच विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही परीक्षा अतिशय महत्त्वाची आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांची या परीक्षेसाठी पूर्ण तयारी करून घेण्यासाठी ‘केबीएस’कडून प्रयत्न करण्यात येत आहेत. हा परिसंवाद केवळ टअऌ-उएळ साठी नसून एन्ट्रन्स परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही आहे. किंवा पार्ट टाइम एमबीए करू इच्छिणाऱ्या सर्वांसाठीच हा परिसंवाद उपयुक्त आहे, असे कोहिनूर बिझनेस स्कूलचे मार्केटिंग हेड ब्रायन डिसूझा यांनी सांगितले.
या परीक्षेत यशस्वी कसे व्हायचे, अधिकाधिक गुण संपन्न कसे करावेत, लेखी परीक्षेत गुणांची टक्केवारी कशी वाढवावी, व्हर्बल, लॉजिकल रिझनिंग त्याचबरोबर करिअर प्लॅनिंग, बी-स्कूलची निवड कशी कराल, कोणते क्षेत्र निवडाल आणि एकंदर प्रवेश प्रक्रियेबाबत या परिसंवादात ‘केबीएस’चे प्राध्यापक पंकज तावडे यांनी मार्गदर्शन केले.
तसेच ‘लोकमत’तर्फे हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यामागे अधिकाधिक विद्यार्थ्यांना एमबीए किंवा तत्सम परीक्षांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहन देणे हा उद्देश आहे. अशा परीक्षांना सामोरे जाताना कोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात, सोप्या पद्धतीने प्रश्न सोडवण्यासाठीच्या ट्रिक्स त्यांना मार्गदर्शकांकडून सहजपणे समजाव्यात हा उद्देश आहे, अशी माहिती ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाचे साहाय्यक महाव्यवस्थापक राघवेंद्र सेठ यांनी विद्यार्थ्यांना दिली.
या वेळी आयडियल क्रेडिअन्सचे प्राध्यापक विवेक सारडा यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. क्वॉन्टीटेटिव्ह पद्धतीचे प्रश्न सोडविण्यासाठी वापरण्याच्या ट्रिक्स काही उदाहरणांसह त्यांनी दाखविल्या. विद्यार्थ्यांनीही मनातील शंका मार्गदर्शकांना विचारल्या. असा दुहेरी संवाद साधत परिसंवादाचा पहिला दिवस दिमाखात पार पडला. (प्रतिनिधी)