एलबीटी वसुलीत मनपाची आघाडी
By Admin | Updated: July 10, 2014 00:17 IST2014-07-10T00:17:49+5:302014-07-10T00:17:49+5:30
नवी मुंबई महापालिकेने चालू आर्थिक वर्षाचा एलबीटी कर वसूल करण्यात आघाडी घेतली आहे.

एलबीटी वसुलीत मनपाची आघाडी
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने चालू आर्थिक वर्षाचा एलबीटी कर वसूल करण्यात आघाडी घेतली आहे. मागील तीन महिन्यात एलबीटी विभागाने तब्बल 2क्क् कोटीचा कर वसूल केला आहे. यात स्टॅम्पडय़ूटी करातून सुमारे 17 कोटी रुपये प्राप्त झाल्याची माहिती एलबीटी विभागाचे उपायुक्त सुधीर चेके यांनी दिली.
मुंबई वगळता उर्वरित राज्यात एप्रिल 2क्13 मध्ये एलबीटी करप्रणाली लागू करण्यात आली. एमएमआरडीए क्षेत्रतील मुंबई वगळता अन्य महापालिकांमध्ये एलबीटीचे दर समांतर असावेत अशी शासनाची धारणा होती. मात्र एलबीटी लागू करण्यावरुनच व्यापारी, उद्योजक आणि शासनामध्ये निर्माण झालेला वाद अजून शमलेला नाही. त्यामुळे नवी मुंबई महापालिका क्षेत्रतील उद्योजक, व्यापारी व लघु उद्योजकांनी नव्याने लागू करण्यात आलेल्या एलबीटी करात आणखी
कपात करण्याची मागणी लावून धरली आहे.
या पाश्र्वभूमीवर ठाणो जिल्हय़ाचे पालकमंत्री गणोश नाईक यांनी एलबीटी दरात कपात करुन शासनाकडे मंजुरीसाठी नव्याने प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांना केल्या होत्या. त्यानुसार आयुक्त आबासाहेब ज:हाड यांनी महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होऊ न देता एलबीटीचे दर दीड टक्क्यांवर आणले.
त्यामुळे महापालिका क्षेत्रतील व्यापारी व उद्योजकांनीही
एलबीटी कर भरण्यास तयारी दर्शविली. त्याचा परिणाम म्हणून गेल्या तीन महिन्यात 2क्क् कोटींचा कर वसूल करण्यात संबंधित विभागाला यश आले आहे. (प्रतिनिधी)
एलबीटी करप्रणालीमध्ये अनेक जीवनावश्यक वस्तूंवर एलबीटी कर माफ करण्यात आल्यामुळे त्याचा परिणाम महापालिकेच्या तिजोरीवर पडत आहे. त्यामुळे उपकराच्या थकीत रकमेच्या वसुलीसाठी महापालिका प्रशासनाला कंबर कसावी लागत आहे. त्याचबरोबर व्यापारी व उद्योजकांकडे थकीत असलेली सुमारे 1क्क् कोटींची रक्कम वसूल करणो देखील एलबीटी विभागापुढे एक आव्हान आहे. चालू आर्थिक वर्षाकरिता एलबीटी विभागास 800 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ते उद्दिष्ट गाठताना एलबीटी विभागाला कसरत करावी लागणार आहे.