Join us  

उन्हामुळे १२ राज्यांमध्ये लाहीलाही; मुंबईत गुढीपाडव्याला गारपीट?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2024 6:09 AM

७ राज्यांत पावसाची; जम्मू-काश्मीर, हिमाचलात हिमवृष्टीची शक्यता

नवी दिल्ली : देशातील १२ राज्यांत उष्णतेची लाट आली आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशा व पश्चिम बंगालमध्ये तापमान ४३ अंशांवर पोहोचले. येत्या काही दिवसांत तापमान आणखी वाढेल, असा इशारा दिला आहे.राजस्थान, मध्य प्रदेश, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, केरळ व सिक्कीममध्ये पावसाची, तर जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील काही भागांत हिमवृष्टीची शक्यता आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेशातील ३३ जिल्ह्यांत गारांसह पाऊस पडू शकतो. बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. 

गुढीपाडव्याला गारपीट?मुंबई : राज्यातील कमाल तापमानात उत्तरोत्तर वाढ नोंदविण्यात येत असतानाच ७ ते १० एप्रिलदरम्यान तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस व वादळी पावसाची शक्यता आहे, तर विदर्भात काही ठिकाणी गारपीट होईल, असा अंदाज आहे. 

टॅग्स :पाऊसउष्माघात