मुंबई : मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डीमेलो मार्गाला जोडणाऱ्या कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाचे मुख्य बांधकाम ठरलेल्या वेळेत म्हणजेच १० जूनपर्यंत पूर्ण झाले आहे. आता वाहतुकीसाठी आवश्यक लेन मार्किंग, पथदिवे, रंगरंगोटी, दिशादर्शक फलक उभारणीची कामे सुरू असून पुढच्या चार दिवसांत पूर्ण होतील. त्यामुळे या आठवड्यात कर्नाक रेल्वे पूल वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी सज्ज असल्याचे पालिकेच्या पूल विभागाकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.दक्षिण मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मशीद बंदर आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे.
१२५ वर्षे जुना कर्नाक पूल धोकादायक झाला होता. त्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने ऑगस्ट २०२२ मध्ये पूल पाडला. मध्य रेल्वे प्राधिकरणाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार कर्नाक पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. आर.सी.सी. डेक स्लॅब, डांबरीकरण, महानगरपालिकेच्या हद्दीतील पूर्व आणि पश्चिम बाजूचे पोहोच रस्ते इत्यादी कामे पूर्ण झाल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.
वाहतूक पोलिसांसमवेत समन्वय साधणारलोड टेस्टिंगचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर व्हीजेटीआयच्या तज्ज्ञांशी सल्लामसलत करून आणि वाहतूक पोलिसांसमवेत समन्वय साधून पूल वाहतुकीस खुला करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
कर्नाक पुलावरील पूर्व - पश्चिम मुख्य वाहतूक मार्ग नागरिकांच्या सेवेत दाखल झाला आहे. पश्चिम दिशेकडील रस्त्याचे काम पावसाळ्यानंतर केले जाणार आहे. त्यामुळे जिन्याचे काम पावसाळ्यानंतर होईल.- अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त
जूनला अहवाल मिळणार रंगरंगोटी, दिशादर्शक फलक, पथदिवे, थर्मोप्लास्ट, कॅट आईज आदी कामे १४ जूनपर्यंत पूर्ण केली जातील. पुलाची भारक्षमता, स्थिरता आणि सुरक्षितता तपासण्यासाठी १३ जूनला लोड टेस्टिंग होईल. त्याचा अहवाल ४८ तासांत म्हणजे १५ जूनला मिळणे अपेक्षित आहे.
कर्नाक पूल जोडणार पूर्व-पश्चिम भागमुंबईच्या दक्षिण भागातील पूर्व-पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा दुवावाहतुकीसाठी सुरक्षित व अधिक सुविधा उपलब्ध होणारपूर्व मुक्तमार्गावरील वाहतूक, तसेच पी. डीमेलो मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदतपी. डीमेलो मार्गावरून गिरगाव, चर्चगेट, मंत्रालय, काळबादेवी, धोबी तलाव परिसरात वाहतूक सुविधायुसूफ मेहरअली मार्ग, मोहम्मद अली मार्ग, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग, काझी सय्यद मार्ग या भागातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार