भारतीयांचाच ‘डंका’
By Admin | Updated: June 2, 2014 23:41 IST2014-06-02T23:41:31+5:302014-06-02T23:41:31+5:30
आयपीएलच्या सातव्या पर्वात भारतीय खेळाडूंचाच बोलबाला राहिला. धावा काढण्यात असो वा बळी घेण्यात भारतीय खेळाडूंनी विदेशी खेळाडूंना बरेच मागे टाकले.

भारतीयांचाच ‘डंका’
>विदेशी खेळाडू मागे : फलंदाज व गोलंदाजांचे वर्चस्व
नवी दिल्ली : आयपीएलच्या सातव्या पर्वात भारतीय खेळाडूंचाच बोलबाला राहिला. धावा काढण्यात असो वा बळी घेण्यात भारतीय खेळाडूंनी विदेशी खेळाडूंना बरेच मागे टाकले.
कोलकाता नाईट रायडर्सने रविवारी बेंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर पहिल्यांदा फायनल खेळणा:या किंग्ज इलेव्हन पंजाबला तीन गडय़ांनी नमवून या स्पर्धेत दुस:यांदा जेतेपदाचा मान मिळविला.
गौतम गंभीर : फायनल गौतम गंभीरविरुद्ध जॉर्ज बेली अशी लढत होती. या चढाओढीत भारतीय खेळाडू बेलीवर हावी झाला. गंभीरने याबाबतीत चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या दोनदा आयपीएल जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली.
रॉबिन उथप्पाच्या सर्वाधिक धावा : स्पर्धेत सर्वाधिक धावा काढण्याचा मान कोलकाता संघाचा सलामीवीर रॉबिन उथप्पाला जातो. त्याने 66क् धावा केल्या. चेन्नईचा ड्वेन स्मिथ (566) दुस:या स्थानावर आहे. तिस:या स्थानावर मॅन ऑफ द सिरिज बनलेला पंजाबचा ग्लेन मॅक्सवेल (552 धावा) तर चौथ्या स्थानावर हैदराबादचा डेव्हिड वॉर्नर(528 धावा) आणि पाचव्या स्थानावर चेन्नईचा सुरेश रैना (523 धावा) हे आहेत.
मोहित शर्माचे सर्वाधिक बळी : गडी बाद करण्यात चेन्नईचा मोहित सर्वात पुढे आहे. त्याने 23 बळी घेतले. कोलकाताचा सुनील नरेन याने 21, हैदराबादचा भुवनेश्वर कुमार याने 2क्, चेन्नईचा रवींद्र जडेजा याने 19 आणि पंजाबचा संदीप शर्मा याने 18 बळी घेतले.
स्पर्धेत ज्या तीन शतकांची नोंद झाली त्यातील दोन शतके भारतीयांची होती. पंजाबचा फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने चेन्नईविरुद्ध दुस:या क्लालिफायरमध्ये 122 धावा केल्या. सातव्या पर्वातील ही सर्वाधिक मोठी वैयक्तिक खेळी होती. साहाने नाबाद 115, तर लेंडल सिमन्स याने पंजाबविरुद्ध नाबाद 1क्क् धावा केल्या होत्या. सातव्या पर्वात 12 गोलंदाजांनी एका डावांत प्रत्येकी चार बळी घेतले. सर्वश्रेष्ठ मारा केला तो जडेजाने. त्याने 12 धावांत चार बळी घेतले होते. या 12 पैकी नऊ गोलंदाज तर भारतीय होते. (वृत्तसंस्था)
रिद्धिमान साहा : बंगालचा यष्टिरक्षक- फलंदाज रिद्धिमान साहा याने पंजाबसाठी ठोकलेल्या नाबाद 115 धावा टी-2क् च्या इतिहासात अंतिम सामन्यात भारतीयाने ठोकलेल्या सर्वाधिक धावा होत्या. फायनलमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीत भारतीयच अग्रक्रमावर होते. फायनलमध्ये सहानंतर ज्या भारतीयांनी बाजी मारली त्यात मनन वोहरा(67 धावा), पीयूष चावला (2 बळी आणि नाबाद 13 धावा), युसूफ पठाण(36 धावा) आणि कर्णवीरसिंग(54 धावांत चार बळी) यांचा समावेश होता.
मनीष पांडे : या सामन्याचा हिरो ठरला मनीष पांडे. त्याने 94 धावांची मॅचविनिंग खेळी केल्याने सामनावीर अर्थात तोच ठरला. मनीष पांडे आयपीएलच्या इतिहासात शतक ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू आहे. कोलकातापुढे 2क्क् धावांचे लक्ष्य असताना त्याने या धावा केल्या. फायनलमध्ये भारतीय खेळाडूच्या बळावर सामना फिरल्याचे हे मोठे उदाहरण आहे.