आयआयटीयन्सची ‘विद्युतभरारी’

By Admin | Updated: May 17, 2015 02:03 IST2015-05-17T02:03:48+5:302015-05-17T02:03:48+5:30

झूप... झूू.. झूम... या रेसिंग कारच्या आवाजाने आयआयटी मुंबईचा परिसर गजबजला. रेसिंग कारचा थरार आज याचि देहि याचि डोळा मुंबईकरांनी अनुभवला. निमित्त होते ते विजेवर चालणारी ईवो ४चे.

IIT's 'electric power' | आयआयटीयन्सची ‘विद्युतभरारी’

आयआयटीयन्सची ‘विद्युतभरारी’

महेश चेमटे ल्ल मुंबई
झूप... झूू.. झूम... या रेसिंग कारच्या आवाजाने आयआयटी मुंबईचा परिसर गजबजला. रेसिंग कारचा थरार आज याचि देहि याचि डोळा मुंबईकरांनी अनुभवला. निमित्त होते ते विजेवर चालणारी ईवो ४चे.
आयआयटी मुंबईच्या ५५ विद्यार्थ्यांच्या जिद्द आणि अथक परिश्रमांमुळे ईवो ४ ही विजेवर चालणारी रेसिंग कार प्रत्यक्षात रस्त्यावर धावली. आयआयटी मुंबईच्या पी.आर. सक्सेना सभागृहात या रेसिंग कारचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला एनआरबीच्या व्यवस्थापकीय संचालिका हर्षबीना झवेरी, आयआयटी मुंबई स्टुडंट अफेअरचे अधिष्ठाता सौम्य मुखर्जी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या ईवो ४चे भरभरून कौतक केले. या रेसिंग कारला पाहून मी खरोखरच प्रभावित झालो. ही कार बनवणाऱ्या विद्यार्थी आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे कौतुक करावे तितके थोडे आहे. जुलै महिन्यात होणाऱ्या स्पर्धेत आयआयटी मुंबई नक्कीच विजयी होईल, यात दुमत नाही, असे गौरवोद्गार मुखर्जी यांनी काढले. ९ ते १२ जुलै या कालावधीत इंग्लंडमधील सिल्वरस्टोन सर्किटवर ‘फॉम्युला स्टुडंट’ ही स्पर्धा भरवण्यात येणार आहे.

च्या कारची बॉडी हलक्या पण मजबूत अशा अ‍ॅल्युमिनियम हनीकॉम्बने बनवण्यात आली आहे. हलक्या वजनाचे कार्बन फायबर सस्पेन्शन, हायब्रीड प्लॅनेटरी गिअर बॉक्स यामुळे ही कार ० ते १०० किमी प्रतितास इतका वेग फक्त ३.५ सेकंदांत धारण करते. ईवोची बॅटरी क्षमता ३८९ व्होल्टेज आहे.

च्सुरक्षिततेच्या दृष्टीने ड्रायव्हर सुट, फायरवॉल, थर्मल टेप यांसह १२ व्होल्टेजची बॅटरी बसवण्यात आली आहे. शंभराहून अधिक स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होतात. या सर्वांमध्ये ईवो ४ ही अत्याधुनिक, १५ सेफ्टी सेंसरने सज्ज कार आपली छाप पाडेल, असा विद्यार्थ्यांना आत्मविश्वास आहे.

Web Title: IIT's 'electric power'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.