- मुकेश चव्हाण
राज्यात काही दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आपल्याकडे शिल्लक असल्याची माहिती समोर आली होती. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अनेक मंडळांना राक्तदान शिबीराचे आयोजन करण्याचे आवाहन केले होते. सरकारच्या या आवाहनाला मान देत ताडदेवमधील राज राजेश्वरी प्रतिष्ठानने आज रक्तदान शिबिर आयोजित केले होते.
गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी सरकारने 14 एप्रिल पर्यंत लॉकडॉऊन ठेवण्याचे आदेश जारी केले आहे.
शिबीरास भरघोस प्रतिसाद दिला त्याबद्दल राज राजेश्वरी प्रतिष्ठान रक्तदात्यांचे आभारी आहे. तसेच मुंबईतला पहिला चैत्र नवरात्रोत्सव साजरा करणारं मंडळ म्हणून राज राजेश्वरी प्रतिष्ठानची ओळख आहे. दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राज राजेश्वरी प्रतिष्ठान आजोजित केले जातात असं अर्षक पवार , अतुल विचारे, अमित मोरे आणि हर्षल गुरव यांनी सांगितले.