रेल्वे स्थानके होणार हायटेक
By Admin | Updated: July 9, 2014 00:27 IST2014-07-09T00:27:44+5:302014-07-09T00:27:44+5:30
रेल्वे अर्थसंकल्पात मुंबईकरांची जरी निराशा झाली असली तरी या अर्थसंकल्पात प्रवाशांसाठी हायटेक सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रेल्वे स्थानके होणार हायटेक
सुशांत मोरे- मुंबई
रेल्वे अर्थसंकल्पात मुंबईकरांची जरी निराशा झाली असली तरी या अर्थसंकल्पात प्रवाशांसाठी हायटेक सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा मोठा नाही तर थोडय़ा प्रमाणात फायदा मुंबईकर प्रवाशांना मिळेल, अशी आशा आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मेल-एक्स्प्रेस गाडय़ांचा थांबा असणा:या स्थानकांवर वायफाय सुविधा तसेच खानपान सेवा सुधारतानाच स्वच्छतेवर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून दररोज 75 लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र या प्रवाशांना प्रत्येक अर्थसंकल्पात ठेंगाच दाखवला जातो. या दोन्ही रेल्वे प्रशासनाला प्रवासी उत्पन्नातून वर्षाला 6क्क् ते 8क्क् कोटी रुपये मिळतात. तरीही सुविधा देताना रेल्वेकडून आखडता हात घेतला जातो. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पात नवीन सरकारने स्थानक आणि ट्रेनमधील मूलभूत सुविधांवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. तिकिटांच्या रांगेतून प्रवाशांची सुटका करण्यासाठी एटीव्हीएम आणले. आता याची संख्या अधिक वाढवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. या अर्थसंकल्पातही त्यावर भर दिला असून मध्य रेल्वे मार्गावर जवळपास 4क्क् तर पश्चिम रेल्वे मार्गावर 25क् पेक्षा अधिक एटीव्हीएम येणार आहेत. त्यामुळे तिकीट मिळवण्याचा प्रवाशांचा मार्ग सोप्पा होणार आहे. तसेच मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या प्रत्येकी एका स्थानकावर कॉइन वेंिडंग तिकीट मशिन यापूर्वीच आणल्या असून त्याबाबतचीही घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली. पाच रुपये आणि दहा रुपये किमतीचे तिकीट मिळवण्यासाठी या किमतीचे कॉइन मशिनमध्ये टाकल्यास तिकीट मशिनमधून मिळेल. ही मशिन मध्य रेल्वेच्या सीएसटी आणि पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर बसविली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कॅटरिंग सेवा सुधारण्याबरोबरच स्वच्छतेवर भर देण्यासाठी सीसीटीव्हींचा वापर करण्याचा निर्णय या अर्थसंकल्पात घेतला असून मुंबईतील रेल्वे स्थानकांवर त्याचा नक्की फायदा होईल, अशी आशा रेल्वे अधिकारी व्यक्त करत आहेत.
4 हजार आरपीएफ कॉन्स्टेबल :
मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकांवर प्रवास करणा:या महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. 4 हजार आरपीएफ कॉन्स्टेबलची भरती केली जाणार असून यातील काही कॉन्स्टेबल मुंबईच्या वाटय़ाला आल्यास महिला सुरक्षेचा प्रश्न सुटेल.
वायफाय :
मुंबईतील लांब पल्ल्याच्या काही स्थानकांवर वायफाय देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ए आणि ए-1 वर्गातील स्थानकांवर ही सुविधा असेल. मुंबईतील चर्चगेट, मुंबई सेंट्रल, वांद्रे, बोरीवली, सीएसटी, एलटीटी, दादर, ठाणो, कल्याण स्थानकांवर ही सुविधा असेल.
स्वच्छतेवर लक्ष सीसीटीव्हीद्वारे :
स्थानकांवर यापुढे स्वच्छतेवर भर दिला जाणार असून सीसीटीव्हीद्वारे त्यावर लक्ष दिले जाणार आहे. खासगी सेवांमार्फत हा प्रयोग केला जाणार आहे.
कॉइन वेंडिंग तिकीट मशिन - प्रवाशांना एटीव्हीएमसारखीच आणखी एक सुविधा मिळेल.
कॅटरिंग सुविधा सुधारणार :
मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकांवरील फलाटांवर मोठय़ा प्रमाणात खाद्यपदार्थाचे स्टॉल आहेत. मात्र येथे मिळणा:या खाद्यपदार्थाचा दर्जा हा लवकरच सुधारेल.
पादचारी पूल, सरकते जिने :
स्थानकांवर पादचारी पूल आणि सरकते जिने बसवण्यात येणार आहेत. मात्र मुंबईतील स्थानकांवर यापूर्वीच पादचारी पुलांची संख्या वाढवण्यात आली आहे. तर आणखी
सरकते जिने भविष्यात
येणार आहेत.
पाण्याची सुविधा :
सध्या प्रत्येक फलाटावर पाणपोईची सुविधा आहे. या पाणपोईंची अत्यंत बिकट अवस्था असून त्यामुळे पाण्याची व्यवस्था सुधारेल अशी अपेक्षा आहे.