Join us  

मुंबईकरांसाठी खूषखबर! शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 92% पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 6:03 AM

वर्षभराची चिंता मिटली; तलाव भरण्यासाठी सव्वा लाख दशलक्ष लीटरची गरज

मुंबई : राज्यात सर्वत्र पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावल्यामुळे मुंबईलापाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी वाढू लागली आहे. त्यामुळे नागरिकांची पाण्याची चिंता मिटली आहे. वर्षभराचा जलसाठा पूर्ण होण्यासाठी तलावांमध्ये आता केवळ आठ टक्के जलसाठ्याची गरज आहे.जुलै महिन्यात मुसळधार हजेरी लावणाºया पावसाने पंधरवड्यातच तलाव फुल्ल केले. तानसा, विहार, तुळशी आणि मोडक सागर तलाव एकापाठोपाठ एक भरून वाहू लागले. मात्र, जुलैच्या दुसºया पंधरवड्यात पावसाने दडी मारली. त्यामुळे तलावातील पाण्याच्या पताळीत फारशी वाढ झाली नाही. तरीही तलावांमध्ये ७५ टक्क्यांहून अधिक जलसाठा असल्याने पाण्याची चिंता नव्हती. मात्र पावसाने मारलेली दडी कायम राहिल्यास वर्षभराचा जलसाठा जमा न झाल्यास पुढच्या वर्षी उन्हाळ्यात पाणीकपातीचा सामना करावा लागण्याची शक्यता होती.मुंबईला दररोज ३७५० दशलक्ष लीटर्स पाणीपुरवठा होतो. वर्षभर हा पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी आॅक्टोबर महिन्यात तलावांमध्ये१४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे आवश्यक असते. सध्या येथील तलावांमध्ये एकूण १३ लाख १८ हजार दशलक्ष लीटर जलसाठा आहे. वर्षभराचा कोटा पूर्ण होण्यासाठी एक लाख २८ हजार दशलक्ष लीटर जलसाठा जमा होणे आवश्यक आहे.असा आहे जलसाठा (आकडेवारी दशलक्ष लीटरमध्ये)२०१८- १३ लाख १८ हजार२०१७- १३ लाख २६ हजारजलसाठ्याची आकडेवारी (मीटर्समध्ये)तलाव                 कमाल      किमान      आजची स्थितीमोडक सागर     १६३.१५     १४३. २६         १६३.१६तानसा               १२८.६३     ११८.८७          १२८.६१विहार                 ८०.१२        ७३.९२           ८०.१८तुळशी               १३९.१७      १३१.०७         १३९.२३अपर वैतरणा     ६०३.५१      ५९५.४४        ६०२.४४भातसा               १४२.०७      १०४.९०         १३८.८५मध्य वैतरणा       २८५.००      २२०.००        २८३.५९

टॅग्स :धरणपाणीमुंबई