गेट वे ते नवी मुंबई विमानतळ सुसाट....

By दीपक भातुसे | Updated: June 9, 2025 12:30 IST2025-06-09T12:29:53+5:302025-06-09T12:30:20+5:30

मुंबई आणि नवी मुंबईला जलद आणि पर्यावरण पूरक मार्गाने जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा वॉटर टॅक्सी प्रकल्पाची आखणी राज्य सरकारने केली आहे. मेट्रो आणि रस्ते मार्गाने मुंबई आणि लगतच्या शहरांना जोडण्याची कामे वेगाने सुरू असतानाच वाहतूककोंडीतून सुटका देणारा आणि वेळ वाचवणारा वॉटर टॅक्सीचा आणखी एक पर्याय लोकांना उपलब्ध होणार आहे. 

Gateway to Navi Mumbai Airport is very convenient.... | गेट वे ते नवी मुंबई विमानतळ सुसाट....

गेट वे ते नवी मुंबई विमानतळ सुसाट....

- दीपक भातुसे
(विशेष प्रतिनिधी)

मुंबई आणि नवी मुंबईला जलद आणि पर्यावरण पूरक मार्गाने जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा वॉटर टॅक्सी प्रकल्पाची आखणी राज्य सरकारने केली आहे. मेट्रो आणि रस्ते मार्गाने मुंबई आणि लगतच्या शहरांना जोडण्याची कामे वेगाने सुरू असतानाच वाहतूककोंडीतून सुटका देणारा आणि वेळ वाचवणारा वॉटर टॅक्सीचा आणखी एक पर्याय लोकांना उपलब्ध होणार आहे. 

सध्या कुलाबा ते नवी मुंबई विमानतळ परिसरात जाण्यासाठी सायन-वाशी मार्गे किंवा अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतूचा पर्याय उपलब्ध आहे. अटल सेतूवरून जायचे म्हटले तरी वाहतूककोंडीमुळे साधारणतः ६० ते ७० मिनिटे लागतात. मात्र, वॉटर टॅक्सीद्वारे हा प्रवास ४० मिनिटांत करता येणार आहे.

कुलाबा  गेटवे ऑफ इंडिया येथील रेडिओ क्लब येथील जेट्टीवरून या वॉटर टॅक्सीचा प्रवास सुरू होऊन तो नवी मुंबई विमानतळाजवळ उभारण्यात येणाऱ्या जेट्टीपर्यंत घेऊन जाईल. या प्रकल्पासाठी नवी मुंबई विमानतळापासून १.२ किलोमीटर अंतरावर असलेल्या तारघर गावात एकात्मिक आंतर्देशीय जलवाहतूक टर्मिनल उभारण्याची योजना तयार केली आहे. ही जागा पनवेल खाडीच्या दक्षिण तीरावर आहे. या टर्मिनलमुळे केवळ प्रवासी, पर्यटकच नव्हे तर दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई दरम्यान मालवाहतूकही सुलभ होणार आहे.

कुलाबा ते नवी मुंबई विमानतळ हा प्रवास इतर वाहतुकीच्या साधनांपेक्षा जलमार्गाने जवळचा आहे. गेटवे ऑफ इंडिया आणि नवी मुंबई विमानतळापर्यंत रस्त्याने अंतर अनुक्रमे ४१ किलोमीटर आहे, तर जलमार्गाने हेच अंतर २४ किलोमीटर आहे. जलमार्गांचा वेग ताशी ३०-४० किमी असल्याने, नवी मुंबई विमानतळाजवळून दक्षिण मुंबईला ३०-४० मिनिटांत पोहोचता येईल. सुरुवातीला वॉटर टॅक्सीने दररोज १,२७० प्रवाशांची वाहतूक होईल असा अंदाज आहे, तर पुढे ३०-३५ वर्षांत या जलमार्गावर १४,३०० पर्यंत प्रवासी वाढण्याचा अंदाज आहे.

प्रस्तावित टर्मिनलमध्ये ४० ते ८० प्रवासी बोटींची क्षमता असलेली २३० मीटर जेट्टी असेल. वॉटर टॅक्सीमध्ये चढण्यासाठी एक मोठा हलवता येणारा गँगवे असेल. तसेच इथे स्थानिक आणि पर्यटकांसाठी बसण्याची व्यवस्था असेल. एकात्मिक जल टर्मिनल इमारत (३,००० चौरस मीटर) प्रति तास १,८०० प्रवाशांच्या वाहतुकीला सामावून घेण्यासाठी डिझाइन केलेली आहे. तसेच कार, टॅक्सी, बस आणि इतर वाहनांसाठी पार्किंग क्षेत्र, पिकअप आणि ड्रॉप-ऑफ सुविधा इथे समाविष्ट आहेत. सिडको आणि राज्याच्या बंदर विभागामार्फत हा प्रकल्प राबवण्यात येणार असून, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड (एमएमबी) टर्मिनलच्या बांधकामाची देखरेख करणार आहे.

 

Web Title: Gateway to Navi Mumbai Airport is very convenient....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.