मुंबई : ठाणे येथील आनंद त्रिपाठी (४२) यांना वडाळा परिसरात उपाहारगृहाच्या व्यवसायाचे आमिष दाखवून, त्यांच्याकडून ३१ लाख ७० हजार रुपये उकळले.२९ जून, २००९ ते ३१ डिसेंबर, २०१४ दरम्यान ही फसवणूक करण्यात आली आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्रिपाठी यांनी मंगळवारी वडाळा टी. टी. पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
व्यवसायाच्या नावाखाली फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 06:02 IST