दुमदुमला विठूनामाचा गजर !

By Admin | Updated: July 10, 2014 00:20 IST2014-07-10T00:20:04+5:302014-07-10T00:20:04+5:30

ठिकठिकाणी मुलांच्या निघालेल्या दिंडय़ा अशा उत्साही आणि भक्तिपूर्ण वातावरणात ठाणो शहर आणि जिल्ह्यात आषाढी एकादशी साजरी झाली.

Dumadumala Vitunama alarm! | दुमदुमला विठूनामाचा गजर !

दुमदुमला विठूनामाचा गजर !

ठाणो : विठ्ठल-रखुमाईची भक्तिभावाने केलेली पूजा, विठूनामाचा गजर आणि ठिकठिकाणी मुलांच्या निघालेल्या दिंडय़ा अशा उत्साही आणि भक्तिपूर्ण वातावरणात ठाणो शहर आणि जिल्ह्यात आषाढी एकादशी साजरी झाली. जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या मंदिरांत भाविकांनी  सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती.
आषाढी एकादशीचा उत्साह बुधवारी संपूर्ण जिल्ह्यात पाहायला मिळाला. ठाण्यातील दमाणी इस्टेट परिसरातील विठ्ठल-रखुमाईच्या मंदिरात, खोपट सिद्धेश्वर तलाव येथील मंदिरात, कौपिनेश्वर मंदिर, ज्ञानराज ट्रस्टच्या विठ्ठल मंदिरात सकाळपासूनच भक्तांनी रांगा लावल्या होत्या. तर एकादशीच्या निमित्ताने ठाण्यात विविध मंदिरांमध्ये तसेच सामाजिक संस्थांच्या वतीने भजन, सुश्रव्य गायन, प्रवचनाचे कार्यक्रम रंगले होते.
शिवशक्ती सेवा मंडळ संचालित आदर्श विद्या निकेतन काशिमीरा शाळेतही आषाढीनिमित्त दिंडी सोहळा साजरा झाला. शाळेतील सर्व विभागांच्या मुख्याध्यापक, शिक्षकांसह शाळेतील विद्याथ्र्यानी संपूर्ण दिंडीची तयारी केली होती. या पालखी मिरवणुकीत वारकरी पोशाखातील विद्यार्थी टाळ-मृदंगाच्या तालात उत्साहाने दिंडीत सहभागी झाले होते.
वारकरी संप्रदायाचा विद्याथ्र्याना परिचय करून देणो आवश्यक - जोगी
भारतीय संस्कृती व संस्कार टिकवण्यासाठी मराठी शाळांतील शिक्षकांनी संत साहित्य व वारकरी संप्रदायाचा विद्याथ्र्याना परिचय करून देणो आवश्यक आहे, असे मत संत साहित्याचे अभ्यासक अजयकुमार जोगी यांनी व्यक्त केले.
बदलापूर येथील कात्रप विद्यालयातर्फे आषाढी एकादशीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘वारकरी संप्रदाय समाजाचा एक आदर्श’ या विषयावर ते बोलत होते. संत ज्ञानेश्वरांपासून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने वारकरी संप्रदायाची परंपरा सुरू आहे. जोगी यांनी आपल्या भाषणातून संत ज्ञानेश्वरांचे वा्मय, मुक्ताबाईची निरीक्षणशक्ती, तुकाराम महाराजांची साधकवृत्ती तसेच त्यांच्या पत्नीचा नि:स्वार्थपणा, शेख महंमदचे भागवत संप्रदायातले योगदान, गुरू-शिष्य परंपरा यांचा विद्यार्थी व शिक्षक यांना सोप्या भाषेत परिचय करून दिला. विविध संतांची, त्यांच्या साहित्याची माहिती देऊन ते म्हणाले, सर्वच साधू-संतांनी जातीपातीच्या भिंती तोडून टाकल्या. संतांनी आपल्या अभंगांतून, साहित्यातून अपप्रवृत्तीविरुद्ध समाज जागृती केली.
विविध जाती-धर्माचे संत भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन एकत्र आले. या सर्वाना विठ्ठल-रखुमाई एकत्र भोजन वाढत आहेत, असे मोठे सुंदर वर्णन खानदेश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरींनी आपल्या काव्यातून केले आहे. 
मुंब्रा : येथील रेल्वे स्थानकाजवळील प्रमुख 
बाजारपेठेतील पुरातन विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त अभिषेक व पूजेचे आयोजन करण्यात आले.  संध्याकाळी भजन, कीर्तन, यासारख्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. (लोकमत प्रतिनिधी, वार्ताहर)
 
1उल्हासनगर - प्रतिपंढरपूर शहाड बिर्ला विठ्ठल मंदिरात सकाळी 5.3क् वाजता काकड आरती होऊन  कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त रामनाथ सोनवणो व  त्यांची प}ी उज्ज्वला यांच्या हस्ते महापूजा झाली.  विठ्ठलनामाच्या गजरात शेकडो पालख्या शहरात आल्याने वातावरण विठ्ठलमय झाले होते. 
2शहाड गावठाण परिसरातील उंच टेकडीवर बिर्ला परिवाराने कंपनीतील कामगार व गावक:यांसाठी  1967 साली विठ्ठल-रुक्मिणी मंदिर उभारले आहे. मंदिराचा महिमा जिल्हाभर पसरल्याने जिल्ह्यातून आषाढी एकादशीला हजारो विठ्ठलभक्त दर्शनासाठी येतात. यामध्ये वाढ होऊन दर्शनासाठी येणा:यांची संख्या लाखापेक्षा जास्त झाली आहे.
3शहाड मंदिरात सेंच्युरी रेयॉन कंपनीच्या हस्ते सकाळी काकड आरतीनंतर शासकीय पूजा केली जाते. या वर्षी महापूजेचा मान कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त रामनाथ सोनवणो व त्यांची पत्नी यांना मिळाला. या वेळी कंपनीचे संयुक्त अध्यक्ष सुबोध दवे, कार्यकारी अध्यक्ष एस.के. मित्तल, जनसंपर्क अधिकारी अनिल व्यास आदी उपस्थित होते.
4उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याण, कल्याण ग्रामीण, शहापूर, मुरबाड, बदलापूर, येथून शेकडो पालख्या शहाड विठ्ठल मंदिरात आल्या आहेत. सकाळपासूनच दर्शनासाठी विठ्ठलभक्तांच्या लांबचलांब रांगांचे चित्र मंदिरासमोर होते. परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.
 
च्कल्याण : वारक:यांच्या वेशभूषेत विद्याथ्र्यानी काढलेल्या दिंडय़ा, महिला भजनी मंडळांची भजने, कीर्तने व मंदिरांवर केलेली सजावट यासह मोठय़ा भक्तिभावाने कल्याण शहरात आषाढी एकादशी साजरी झाली. 
च्शहाड येथील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरात ग्रामीण भागांतून मोठय़ा प्रमाणात आलेल्या भाविकांच्या दिंडय़ा, विठ्ठलाची महापूजा, भंडारा, याशिवाय गेले तीन दिवस चाललेल्या विविध कार्यक्रमांची समाप्ती, यामुळे हा सर्व परिसर भक्तिमय झाला होता. 
च्एकादशीनिमित्त आज केळी, रताळी, फळे यांचे भाव चांगलेच वाढले होते. उपवासाची भाजणी, साबुदाणा चिवडा, बटाटा, केळी वेफर्स, खजूर अशा उपवासाच्या पदार्थाना मोठी मागणी होती.
 

 

Web Title: Dumadumala Vitunama alarm!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.