खड्डे बुजवायला पैसे नाहीत का? हायकोर्टाचा सरकारला सवाल; लोकांचा जीव जातोय, खड्डे जैसे थे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 02:33 IST2017-09-29T02:33:35+5:302017-09-29T02:33:47+5:30

राज्यभरातील रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांमुळे लोकांचे जीव जात असताना खड्डे का बुजवले जात नाहीत, असा संतप्त सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला.

Do not have money to heal the pits? High Court questions the government; People are becoming insects, like pits | खड्डे बुजवायला पैसे नाहीत का? हायकोर्टाचा सरकारला सवाल; लोकांचा जीव जातोय, खड्डे जैसे थे

खड्डे बुजवायला पैसे नाहीत का? हायकोर्टाचा सरकारला सवाल; लोकांचा जीव जातोय, खड्डे जैसे थे

मुंबई : राज्यभरातील रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांमुळे लोकांचे जीव जात असताना खड्डे का बुजवले जात नाहीत, असा संतप्त सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला. इथेच न थांबता उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे खड्डे बुजवायला पैसे नाहीत का, असाही सवाल केला.
राज्यभर खड्ड्यांमुळे लोकांचे जीव जात असतानाही सरकार ते ग्रामपंचायती डोळे मिटून असल्याने मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर व न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठाने या सर्वांना धारेवर धरले. नगरविकास विभाग व ग्रामीण विभागाला महापालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषद व ग्रामपंचायतींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. या सर्वांना खड्डे का बुजविण्यात आले नाहीत, याचे उत्तर न्यायालयाला देण्यास सांगितले आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणी ८ नोव्हेंबरला ठेवण्यात आली आहे.

महापालिकांनी उत्तर देणे टाळले
राज्यभरातील रस्त्यांची दुर्दशा पाहून उच्च न्यायालयाने स्वत:हून याची गांभीर्याने दखल घेत सुओ मोटो याचिका दाखल करून घेतली आहे. या याचिकेच्या सुनावणीत राज्यातील सर्व महापालिकांना व नगर परिषदांना खड्डे बुजविण्यासंदर्भात वेळोवेळी आदेश देण्यात आले आहेत. मात्र काही महापालिका व नगर परिषदांनी त्यावर अद्याप उत्तरच दिलेले नाही.

Web Title: Do not have money to heal the pits? High Court questions the government; People are becoming insects, like pits