Join us  

Coronavirus: परदेशातून आलेले हॉटेलमध्ये क्वारंटाइन; मुंबईत ८८ हॉटेलमध्ये ३,३४३ कक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2020 2:33 AM

विशेष विमानाने परतलेल्यांची काळजी

मुंबई : कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. यामुळे बहुतांश देशात लॉकडाउन करण्यात आले आहे. या कालावधीत वेगवेगळ्या देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यात येणार आहे. याअंतर्गत मुंबईत विशेष विमानांनी परतणाऱ्या नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून क्वारंटाइन केले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने मुंबईतील ८८ हॉटेलमध्ये  तीन हजार ३४३ कक्ष आरक्षित केले आहेत. कोरोना विषाणूसंसर्ग रोखण्यासाठी जगभरात बहुतेक सर्व देशांनी लॉकडाउनचा मार्ग अवलंबला आहे.

त्यामुळे वेगवेगळ्या देशांमध्ये भारतीय नागरिक अडकले आहेत. या सर्व नागरिकांना हवाई आणि जलमार्गे भारतात परत आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याचा भाग म्हणून १२ देशातून अंदाजे ६४ विमानफेऱ्यांमधून एकूण १४ हजार ८०० प्रवासी भारतात येणार आहेत. यापैकी बांगलादेश, फिलिपिन्स, सिंंगापूर, मलेशिया, ब्रिटन आणि अमेरिका या देशांमधून सुमारे १९०० नागरिक मुंबईत येतील, असा पालिकेचा अंदाज आहे. मात्र या नागरिकांना मुंबईत प्रवेश दिला तरी त्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला नाही, याची खात्री करून घेण्यात येणार आहे. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून या नागरिकांना क्वारंटाइन केले जाणार आहे. या कालावधीत तपासणी केल्यानंतर कोरोनाबाधा झालेली आढळल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येईल. क्वारंटाइनसाठी मुंबईतील विविध ८८ हॉटेलमध्ये एकूण ३,३४३ कक्ष आरक्षित करण्यात आले आहेत. यामध्ये दोन/ तीन/ चार /पाच तारांकित तसेच वेगवेगळ्या हॉटेल्ससोबत अपार्टमेंट हॉटेल, ओयो बजेट हॉटेलचाही समावेश आहे. सर्व नागरिकांना हवाई आणि जलमार्गे भारतात परत आणण्यात आले़ १२ देशांतून अंदाजे ६४ विमानफेºयांमधून एकूण १४ हजार ८०० प्रवासी भारतात येणार आहेत.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस