मनोहर कुंभेजकर, मुंबई: ऑपरेशन सिंदूरच्या अद्भुत यशानंतर, भारतीय सैन्याच्या शौर्याला आणि धाडसाला सलाम करण्यासाठी 'तिरंगा पदयात्रा' कांदिवली पूर्व विधानसभेतील समस्त नागरिकांनी कांदिवली पूर्व आणि मालाड पूर्व येथे आयोजित केली होते. या पदयात्रेला कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर उपस्थित होते. आपल्या भारतीय सैन्याच्या शौर्याचा गौरव करण्यासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी तिरंगा यात्रेचे आयोजन केले होते. भारतीय सैन्याच्या धाडसाला आणि शौर्याला आम्ही सलाम करतो, आम्हा सर्वांनाच त्यांचा अभिमान आहे अशा कृतज्ञ भावना आमदार भातखळकर यांनी व्यक्त केल्या.
तसेच माजी सैनिक कर्नल जगदीश बरसीचा, कर्नल अशोक झा, भारतीय सशस्त्र सेनेतील माजी अधिकारी बलराम रेड्डी, जगदीश सिंह, सुनील राउल, कमलेश शर्मा, भारतीय नौदलचे माजी अधिकारी मदनलाल शर्मा, भारतीय वायुदलाच्या माजी अधिकारी अंजली नेरुला सर्वश्री धरम सिंह राठी, गजानन पालवे, हरचित बरार, आणि सुभेदार चोप्रा या निवृत्त सैनिकांचा मालाड पूर्व येथील सी.ओ.डी. येथे सन्मान आणि अभिनंदन करून यात्रेचा समारोप करण्यात आला.नागरिकांनी आयोजित केलेल्या तिरंगा पदयात्रेस मोठ्या संख्येने नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते.