काळू धरणाविरोधात मुरबाडच्या 19 गावांचा निवडणुकीवर बहिष्कार
By Admin | Updated: September 16, 2014 02:45 IST2014-09-16T02:45:30+5:302014-09-16T02:45:30+5:30
काळू नदीवरील धरणाला विरोध करणा:या मुरबाड तालुक्यातील 19 गावपाडय़ांच्या सुमारे 18 हजार मतदारांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

काळू धरणाविरोधात मुरबाडच्या 19 गावांचा निवडणुकीवर बहिष्कार
सुरेश लोखंडे ल्ल ठाणो
काळू नदीवरील धरणाला विरोध करणा:या मुरबाड तालुक्यातील 19 गावपाडय़ांच्या सुमारे 18 हजार मतदारांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, या गावपाडय़ांमधील एकही मतदार मतदान प्रक्रियेत भाग घेणार नसल्याचा ‘इशारा काळू धरणविरोधी शेतकरी कष्टकरी भूमिहीन समुदाय मंच’ने मुरबाड तहसीलदारांना दिला.
मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी काळू धरण प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. काळू नदीच्या परिसरातील सुमारे 41 गावपाडे, एक हजार 2क्क् हेक्टर शेतजमीन आणि एक हजार हेक्टर वन खात्याची जमीन या धरणाखाली जाणार आहे. याशिवाय, औषधी वनस्पती, पशुपक्षी, प्राणी या धरणामुळे देशोधडीला लागणार आहेत. त्यासाठी मागील काही वर्षापासून संघर्ष करीत असलेल्या या गावपाडय़ांना कोणत्याही राजकीय पक्षाने पाठिंबा दिला नाही किंवा त्यांची बाजू शासनदरबारी मांडलेली नाही.
सुमारे 41 पैकी 19 गावपाडय़ांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे धरणविरोधी शेतकरी कष्टकरी भूमिहीन समुदाय मंचचे तळेगाव येथील वरिष्ठ कार्यकर्ते प्रवीण देशमुख यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
लोकसभा निवडणुकीवरदेखील या गावक:यांनी बहिष्कार टाकला होता. यामुळे या गावक:यांचे नेते भगवान भला यांच्यासह पोपटराव देशमुख यांना मतदानाच्या दिवशी स्थानबद्ध केले तरीदेखील या 19 गावांतील एकाही मतदाराने मतदान केले नव्हते.
नेहारी, ताईरवाडी, खुटगाव, वाकडवाडी, शिळेचीवाडी, दिगेफळ, फांगळोशी, भिकरवाडी, खडशेत, उंबरोली, कुंदाचीवाडी, तळेगाव, जरई, आंबिवली, तासोळे बु., तासोळे खु., पांगरवाडी या 19 गावांमधील सुमारे 18 हजार मतदारांनी मतदानावर बहिष्कार घातल्यामुळे या परिसरातील मतदान केंद्रांवर शुकशुकाट होता.
वर्षानुवर्षे सनदशीर मार्गाने आंदोलन करूनदेखील न्याय मिळत नसल्यामुळे गावक:यांनी या निवडणुकीवर देखील बहिष्कार टाकण्याचा एकमताने निर्णय घेतला आहे.