Join us  

पश्चिम बंगालमधील हिंसाचाराविरोधात कांदिवलीत भाजापाने केले धरणे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2021 12:13 PM

कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने कांदिवली येथे धरणे आंदोलन करण्यात आले.

मुंबई: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर जबरदस्त हिंसाचार सुरू केला असून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे खून करण्यात येत आहेत. या राजकीय हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी आज मुंबईभाजपा प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने कांदिवली येथे धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, 'पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्या राज्यात सुडाचे राजकारण चालू झाले आहे. ठिकठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसचे गुंड हल्ले करत आहेत. भाजपा कार्यकर्त्यांचे खून करणे, त्यांच्या घरांची जाळपोळ करणे, त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणाला आगी लावणे असे प्रकार घडत आहेत. ही लोकशाहीची हत्या असून हे सहन करण्या पलीकडचे आहे. हे प्रकार तात्काळ न थांबविल्यास संपूर्ण देशातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कोरोनाच्या काळातही पश्चिम बंगाल मध्ये जाऊन मोठे आंदोलन करतील असा इशारा त्यांनी दिला.

टॅग्स :पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१भाजपाममता बॅनर्जीमुंबई