आव्हाड चक्रव्यूहात
By Admin | Updated: October 1, 2014 23:21 IST2014-10-01T23:21:55+5:302014-10-01T23:21:55+5:30
कळवा-मुंब्रा मतदारसंघात (149) यंदा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांना घेरण्याची व्यूहरचना सर्वपक्षीयांनी आखली आहे.

आव्हाड चक्रव्यूहात
अजित मांडके - ठाणो
कळवा-मुंब्रा मतदारसंघात (149) यंदा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांना घेरण्याची व्यूहरचना सर्वपक्षीयांनी आखली आहे. त्यानुसार, येथे शिवसेनेपाठोपाठ एमआयएम आणि सपाचाही उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याने येथील मुस्लिम मतांचे विभाजन होणार आहे. विभागणा:या या मतांचा फटका आव्हाडांना बसण्याची दाट शक्यता असून त्याचा फायदा घेण्यासाठी सर्वपक्षीय ताकद एकवटली आहे. त्यामुळे मुस्लिम मतांचा जोगवा आपल्याकडे खेचण्यासाठी आव्हाडांना येथे शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. एकूणच सर्वपक्षीय व्यूूहरचना आखली गेली असली तरी प्रत्यक्षात खरी लढत राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसमध्ये होणार असल्याचे चित्र आहे.
कळवा-मुंब्रा मतदारसंघ मराठी आणि मुस्लिमबहुल वस्तीमध्ये विभागला आहे. कळव्यात बहुसंख्य मराठी बांधव आहेत, तर मुंब्य्राच्या पट्टय़ात काही प्रमाणात मराठी बांधव आहेत. परंतु, त्या तुलनेत मुस्लिम वस्ती मुंब्य्रात जास्त असल्याने याच जोरावर मागील निवडणुकीत आव्हाडांची सरशी झाली होती. परंतु, आता काही झाले तरी आव्हाडांना घरचा रस्ता दाखवायचा, असा इरादा सर्वपक्षीयांनी केला आहे. त्यानुसार, निवडणूक लागण्यापूर्वीच शिवसेनेसह काँग्रेस, सपा, एमआयएम आदी पक्षांनी एकत्रित बैठक घेऊन आव्हाडांविरोधात व्यूहरचना आखली. विशेष म्हणजे यामध्ये निवडून कोणीही आला तरी चालेल़, परंतु आव्हाडांना घरचा रस्ता दाखवायचाच, असा निर्धारच या सर्वपक्षीय मंडळींनी केला आहे. या मतदारसंघात महापालिकेचे 19 प्रभाग असून 38 नगरसेवक येथे आहेत. यापैकी राष्ट्रवादीचे येथे 17 नगरसेवक असून काँग्रेसचे 9 आणि एक अपक्ष असे एकूण 27 नगरसेवकांचे प्राबल्य आहे. शिवसेनेचे आठ आणि मनसेचे दोन नगरसेवक येथे आहेत. 2क्क्9 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आव्हाड यांना 65,51क्, शिवसेनेचे राजन किणो यांना 45,821, मनसेच्या प्रशांत पवार यांना 15 हजार 119, समाजवादी पक्षाचे सुरमे यांनी 3,429 आणि बसपाच्या सचिन म्हात्रे यांना 2,756 मते मिळाली होती.
त्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांना 52,9क्4 मते मिळाली होती. राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांना 65,16क् मते मिळाली होती. परांजपे यांना येथे 12,256 एवढी अधिक मते मिळाली होती. परंतु, आता काँग्रेस राष्ट्रवादीपासून वेगळी झाल्याने येथे तसेही मतांचे विभाजन होणार आहे. काँग्रेसकडून येथे स्थानिक नगरसेवक यासीन कुरेशी यांना मैदानात उतरविण्यात आले आहे. शिवसेनेने आव्हाडांचेच पूर्वीचे निकटवर्ती राहिलेले दशरथ पाटील यांना मैदानात उतरविले आहे. त्यात काँग्रेसचे नगरसेवक राजा गवारी हे रवींद्र फाटक यांच्यासोबत शिवसेनेत गेले आहेत. राष्ट्रवादीचे घडय़ाळ काढून गणोश साळवी यांनी पुन्हा भगवा हाती घेतला आहे. त्यामुळे त्यांचाही प्रभाव या ठिकाणी पडणार आहे.
भाजपाकडून अशोक भोईर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांचा नगरसेवक निवडणुकीत पराभव झाला होता.
कळवा-मुंब्य्रात महायुती तुटल्याने येथे मतांचे विभाजन होणार आहे. मनसेने महेश साळवी यांना उमेदवारी दिली आहे. परंतु, त्यांचा येथे फारसा प्रभाव नसल्याने खरी लढत आता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी तिरंगी होणार आहे. शिवाय, अकबरुद्दीन ओवेसींच्या एमआयएमच्या वतीने अशरफ मुलाणी आणि सपाच्या वतीने सिकंदर खान हेदेखील मैदानात उतरले आहेत.