Join us  

Abu Azmi on Raj Thackeray: ज्यांना जनाधार नाही अशा लोकांचं काय ऐकायचं?, राज ठाकरेंना अटक करुन तुरुंगात टाका; अबू आझमी यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2022 1:35 PM

Abu Azmi on Raj Thackeray: ज्यांच्या पक्षाचा फक्त १ आमदार आहे. त्यांना राज्यात जनाधान नाही अशा नेत्यांचं लोकांनी का ऐकायचं? मशिदीमध्ये अजान फक्त दोन मिनिटांसाठी होते आणि त्यास परवानगी आहे.

Abu Azmi on Raj Thackeray: ज्यांच्या पक्षाचा फक्त १ आमदार आहे. त्यांना राज्यात जनाधान नाही अशा नेत्यांचं लोकांनी का ऐकायचं? मशिदीमध्ये अजान फक्त दोन मिनिटांसाठी होते आणि त्यास परवानगी आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी केलेलं वक्तव्य धार्मिक तेढ निर्माण करणं असून त्यांना अटक करुन जेलमध्ये टाकावं, अशी मागणी समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी केली आहे. ते मुंबईत बोलत होते. 

राज ठाकरे यांनी पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्यांवर आक्षेप घेत भोंगे खाली उतरले नाहीत तर आम्ही मशिदीसमोर दुप्पट लाऊड स्पीकर लावून त्यावर हनुमान चालीसा वाजवू, असा इशाराच दिला होता. त्यानंतर राज्यात विविध ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी भोंगे लावून त्यावर हनुमान चालीसा वाजवण्यास सुरुवात केली. पोलिसांनी संबंधित कार्यकर्त्यांवर कारवाई देखील केली. राज यांच्या विधानाचे पडसाद राज्यभर उमटताना पाहायला मिळाले. अनेक नेत्यांनी राज यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. शिवसेनेनं राज यांनी शिवतीर्थावरुन भाजपाचा भोंगा वाजवला, अशी टीका शिवसेनेनं केली होती. तर अबू आझमी यांनीही राज यांच्यावर टीका करत गणपती आणि नवरात्रमध्ये डीजे वाजवला जातो त्यावेळी ध्वनीप्रदुषण होत नाही का?, असा सवाल उपस्थित केला होता. 

अबू आझमी यांनी आज राज यांच्या विधानावर भाष्य करताना त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. "ज्या पक्षाला फार महत्व दिलं जात नाही. ज्यांना जनाधार नाही. अशा नेत्यांचं लोकांनी का ऐकावं? अशा नेत्यांनी धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य करुन वातावरण अशांत करणं योग्य नाही. राज ठाकरे यांना अटक करुन जेलमध्ये टाकलं पाहिजे अशी माझी मागणी आहे", असं अबू आझमी म्हणाले. 

टॅग्स :अबू आझमीराज ठाकरेमनसे