अडीच वर्षात 717 बेवारस मृतदेह!
By Admin | Updated: June 30, 2014 01:45 IST2014-06-30T01:45:05+5:302014-06-30T01:45:05+5:30
मुंबई शहर आणि पूर्व व पश्चिम उपनगरांत 2क्12 सालापासून आतार्पयतच्या अडीच वर्षात 717 बेवारस मृतदेह सापडल्याची माहिती समोर आली आहे.

अडीच वर्षात 717 बेवारस मृतदेह!
>चेतन ननावरे - मुंबई
मुंबई शहर आणि पूर्व व पश्चिम उपनगरांत 2क्12 सालापासून आतार्पयतच्या अडीच वर्षात 717 बेवारस मृतदेह सापडल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील 9क् टक्क्यांहून अधिक मृतदेह हे आसरा न मिळालेल्या बेघरांचे असल्याचा दावा बेघर अभियान संघटनेचे ब्रिजेश आर्या यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण निष्कासन विभागातर्फे पदपथावर बांधलेल्या अनधिकृत झोपडय़ांवर कारवाई सुरू असते. पावसाळ्य़ात झोपडय़ांवर कारवाई केल्याने बेघरांना उघडय़ावरच झोपावे लागते. परिणामी पावसात भिजून आजारी पडल्याने बहुतेक बेघरांना जीव गमावण्याची वेळ येते, अशी माहिती आर्या यांनी दिली.
संघटनेने केलेल्या सव्रेक्षणानुसार, दोन ते तीन पिढय़ांपासून हजारो बेघर हे मुंबईच्या रस्त्यांवरच राहतात. त्यात मराठी भाषिकांची संख्या नगण्य असून गुजरातमधून विस्थापित झालेल्या नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. 2क्11 च्या जनगणनेनुसार, मुंबईत 58 हजार बेघरांची नोंद करण्यात आली आहे. मात्र संघटनेने मुंबईत सुमारे 3 लाख बेघर असल्याचा दावा केला आहे. बेघरांना एक-एक पुरावा मिळवण्यासाठी वर्षभर सरकारी कार्यालयांच्या चकरा माराव्या लागतात. तरीही सुमारे 1क् हजारांहून अधिक बेघरांजवळ आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र असे महत्त्वाचे पुरावे आहेत. नुकत्याच झालेल्या
लोकसभा निवडणुकीत 5 हजार बेघरांनी मतदान केले आहे. त्यामुळे केवळ पदपथावर राहतात म्हणून त्यांना परप्रांतीय म्हणता येणार नाही, असा निष्कर्ष संघटनेने काढला आहे.
पावसाळ्य़ात मरण पावणा:यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे एरव्ही रस्त्याशेजारी उघडय़ावर दिवस काढणा:यांना किमान पावसाळ्य़ात तरी आसरा राहू द्या, अशी मागणी संघटनेने केली आहे.
..म्हणून बेघरांचे मृतदेह बेवारस ठरतात
पोलीस कारवाईला घाबरून आयुष्यभर शेजारी राहिलेले बेघर मृतदेहाचा ताबा घेत नाहीत. परिणामी नातेवाईक नसलेले आणि एकटय़ाने राहणा:या बेघरांच्या मृतदेहांचा समावेश बेवारस मृतदेहांत होत असल्याचे संघटनेने सांगितले.
आधी कायद्याचे पालन करा !
पावसाळ्य़ात बेघरांच्या झोपडय़ांवर कारवाई करणा:या पालिकेने आधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्याची मागणी संघटनेने केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 5 मे 2क्1क् रोजी पालिकेला बेघरांसाठी एक लाख लोकसंख्येमागे एक रात्र निवारागृह बांधण्याचे आदेश दिले आहेत. मात्र संपूर्ण मुंबईत पालिकेने केवळ 1क् रात्र निवारागृहे बांधल्याचे सांगितले आहे. त्यातील काही निवारागृहे ही केवळ कागदावरच असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
1 जानेवारी 2क्12 पासून 22 जून 2क्14 र्पयत एकूण 717 बेवारस मृतदेहांची नोंद मुंबई पोलिसांनी केली आहे. ती पुढीलप्रमाणो -
वर्षबेवारस मृतदेह
2क्12293
2क्1328क्
जून 2क्14 र्पयत144