मुंबई - २००५ दंगल प्रकरणात तत्कालीन शिवसेनेच्या २९ कार्यकर्त्यांची विशेष खासदार-आमदार न्यायालयाने गुरुवारी पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. नारायण राणेंची जुलै २००५ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर त्यांनी दुसऱ्या पक्षात जाण्याची घोषणा केली तेव्हा ही राजकीय दंगल झाली होती.
विशेष न्यायालयाने खा. रवींद्र वायकर आणि मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांचीही निर्दोष मुक्तता केली. मुक्तता झालेल्या अन्य नेत्यांत अशोक केळकर, प्रवीण शेट्ये, महेश सावंत, ज्योती भोसले, स्वाती शिंदे, अजित कदम, स्नेहल जाधव, प्रीती देवहरे, सुधा मेहेर, श्रीधर शेलार, दगडू सकपाळ आणि विशाखा राऊत यांचाही समावेश आहे.
‘‘दोन राजकीय गटांतील वैरामुळे मुंबई शहर धोक्यात आले होते. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस तैनात करण्यात आले होते. तरीही काही जण जखमी झाले व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले,” असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.
Web Summary : A special court acquitted 29 Shiv Sena activists in the 2005 riot case due to lack of evidence. The riots followed Narayan Rane's expulsion from Shiv Sena. The court noted the violence endangered Mumbai and caused property damage.
Web Summary : विशेष अदालत ने 2005 के दंगा मामले में 29 शिवसेना कार्यकर्ताओं को सबूतों के अभाव में बरी कर दिया। दंगे नारायण राणे के शिवसेना से निष्कासन के बाद हुए। अदालत ने हिंसा से मुंबई को खतरे और संपत्ति के नुकसान को नोट किया।