रक्षाबंधनादिवशी बेस्टच्या २१० जादा गाड्या
By Admin | Updated: August 26, 2015 02:59 IST2015-08-26T02:59:28+5:302015-08-26T02:59:28+5:30
रक्षाबंधनाच्या निमित्ताने मुंबई शहर आणि उपनगरांत प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्टतर्फे २९ आॅगस्ट रोजी २१० जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.

रक्षाबंधनादिवशी बेस्टच्या २१० जादा गाड्या
मुंबई : रक्षाबंधनाच्या निमित्ताने मुंबई शहर आणि उपनगरांत प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्टतर्फे २९ आॅगस्ट रोजी २१० जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. या बसगाड्या दुपारी १२.३० वाजल्यापासून सोडण्यात येतील आणि त्या दिवसभर सुरू राहतील. प्रवाशांची जास्त गर्दी आढळल्यास आवश्यकतेनुसार जादा बसगाड्या सोडण्याची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या मदतीसाठी बसथांब्यावर, शिवाय बसस्थानकावर बसनिरीक्षक, वाहतूक अधिकारी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे.