मतदारसंघ 18 उमेदवार 232 !
By Admin | Updated: October 1, 2014 23:20 IST2014-10-01T23:20:27+5:302014-10-01T23:20:27+5:30
विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 62 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.

मतदारसंघ 18 उमेदवार 232 !
ठाणो : विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 62 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील 18 मतदारसंघांत 232 उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. जिल्ह्यातील उल्हासनगर मतदारसंघातून सर्वाधिक 1क् उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. मीरा-भाईंदर आणि डोंबिवली मतदारसंघांतून एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही.
ठाणो जिल्ह्यातील 18 मतदारसंघांतून 382 उमेदवारांनी 415 अर्ज भरले होते. मात्र, छाननीत 84 अर्ज अवैध ठरले. अर्ज मागे घेण्याच्या एक दिवस आधी कळवा-मुंब्रा, ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघातून चौघांनी आपले अर्ज मागे घेतले. बुधवारी जिल्ह्यातील 18 मतदारसंघांतून 62 उमेदवारी अर्ज मागे घेतले. ठाणो शहर मतदारसंघातून दिलीप अकोनी, गिल सिंग, सिद्धार्थ मोकळ, शांतिलाल गाला, प्रमोद इंगळे यांनी माघार घेतल्याने 1क् जण रिंगणात राहिले आहेत. कळवा-मुंब्रा मतदारसंघातून उमेश पाटील, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे कुंदन गोटे, चंदन गोटे आणि मंदार शेवडे यांनी उमेदवारी मागे घेतल्याने 18 जण आमने-सामने येणार आहेत. कोपरी-पाचपाखाडीतून पाच तर ओवळा-माजिवडा मतदारसंघातून एकाने अर्ज मागे घेतला आहे. (प्रतिनिधी)
उल्हासनगरात 1क् जणांची माघार
साई पक्षाचे जीवन इदनानी यांच्यासह ओमी कलानी, नाना बागुल आदी 1क् जणांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने 22 जण रिंगणात आहेत. ज्योती कलानी, कुमार आयलानी, धनंजय बोडारे यांच्यात तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र शहरात आहे. उल्हासनगर मतदारसंघातून 34 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर अजर्पडताळणीच्या दिवशी दोन अर्ज बाद झाले होते. अर्ज माघार घेण्याच्या दिवशी 1क् जणांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक रिंगणात 22 जण आहेत. गेल्या निवडणुकीप्रमाणो ज्योती कलानी अर्ज मागे घेऊन ओमी कलानी यांना पाठिंबा देणार असल्याची अटकळ बांधण्यात येत होती. मात्र, ओमी कलानी यांनी अर्ज मागे घेतल्याने ज्योती कलानी राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार राहणार आहेत. ओमी कलानी यांच्यासह साई पक्षाचे जीवन इदनानी, आशा इदनानी, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष नाना बागुल, भारिपचे इब्राहिम अब्दुल अन्सारी, प्रवीण गायकवाड, जयराम केणो, राजू सोनावणो, मैनुद्दीन इन्नुस शेख, अशोक देशमुख यांनी अर्ज मागे घेतले. साई पक्षाचे जीवन इदनानी कोणाला पाठिंबा देतात, यावर आमदारपदाचे गणित अवलंबून आहे. पालिकेत साई पक्षाला जो महापौरपद देईल, त्याला पाठिंबा देणार असल्याचे संकेत पक्षाचे काही पदाधिकारी देत आहेत. राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी, शिवसेनेचे धनंजय बोडारे, भाजपाचे कुमार आयलानी, काँग्रेसचे प्रकाश कुकरेजा, मनसेचे सचिन कदम यांच्यात खरी लढत असून साई पक्षाच्या पाठिंब्याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. साई पक्षाकडे 1क् नगरसेवक असल्याने पालिकेच्या सत्तेवर साई पक्ष दावा करणार असल्याची चर्चा आहे.
शहापुरात 13 जण रिंगणात
शहापूरच्या आदिवासी राखीव जागेसाठी प्रमुख पाच राजकीय पक्षांसह एकूण 13 उमेदवार लढणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे अशोक ईरनक, शिवसेनेचे दौलत दरोडा, राष्ट्रवादीचे पांडुरंग बरोरा, काँग्रेसचे पद्माकर केव्हारी आणि मनसेचे ज्ञानेश्वर तळपादे हे प्रमुख दावेदार असले तरी सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र खंडवी, बहुजन विकास आघाडीचे गोपाल रेरा, यांनीही कडवे आव्हान उभे केले आहे.
राष्ट्रवादीला लागलेली गळती अजून थांबलेली नाही. शहापूर तालुकाध्यक्ष किसन भांडे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल त्यांच्या हकालपट्टीची घोषणा करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे बरोरा यांच्या प्रचारासाठी आज शहापूर येथे आले असताना ही घोषणा करण्यात आली. किसन भांडे यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या कपिल पाटील यांच्यासाठी उघडपणो काम केले होते.
कल्याण पश्चिमेत
8 जणांचे अर्ज मागे
4उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात 8 जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असून यात काही बंडखोरांसह अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. माघारीनंतर आता या मतदारसंघात 17 उमेदवार एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत.
4कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात एकूण 28 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज छाननी प्रक्रियेत 3 उमेदवारांचे अर्ज बाद ठरल्याने निवडणूक रिंगणात 25 उमेदवार होते. बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अरविंद मोरे (शिवसेना बंडखोर), रमेश हनुमंते, माया कटारिया (दोघेही राष्ट्रवादी बंडखोर), वंदना गीध, अनिल पंडित (दोघेही काँग्रेस बंडखोर) यांच्यासह सुभाष चंदने, निशा जाधव, समीर खान (सर्व अपक्ष) या 8 उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली.
अखेर 9 उमेदवार कायम
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मीरा-भाईंदर मतदारसंघातून वैध ठरलेल्या 9 पैकी एकाही उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्याने हे सर्व उमेदवार निवडणुकीत नशीब आजमावण्यास सज्ज झाले आहेत. या मतदारसंघातून काँग्रेसचे याकुब कुरेशी, राष्ट्रवादीचे गिल्बर्ट मेंडोन्सा, भाजपाचे नरेंद्र मेहता, शिवसेनेचे प्रभाकर म्हात्रे, शेतकरी कामगार पक्षाचे राजन भोसले, बहुजन समाज पार्टीचे इस्लाम शेख व अपक्ष उमेदवार राजीव दोशी, आझाद पटेल व शिवकुमार जैन या 9 उमेदवारांचा समावेश आहे.
मतदारसंघ माघारअंतिम
भिवंडी ग्रा.41क्
शहापूर31क्
भिवंडी (प.)56
भिवंडी (पू.)215
कल्याण (प.)817
मुरबाड215
अंबरनाथ417
उल्हासनगर1क्22
कल्याण (पू.)31क्
डोंबिवलीक्11
कल्याण ग्रा.112
मीरा-भाईंदरक्क्9
ओवळा-
माजिवडा113
कोपरी
पाचपाखाडी511
ठाणो51क्
मुंब्रा-कळवा418
ऐरोली415
बेलापूर115