शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

सरकारचे पर्यावरणाकडे कायमच दुर्लक्ष; माधव गाडगीळ यांच्या सूचनांकडेही काणाडोळा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 7:56 PM

गोवा सरकारने राज्यातील पर्यावरणाकडे कायमच दुर्लक्ष केले आहे. ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी ज्या काही महत्त्वाच्या सूचना केल्या,

पणजी : गोवा सरकारने राज्यातील पर्यावरणाकडे कायमच दुर्लक्ष केले आहे. ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी ज्या काही महत्त्वाच्या सूचना केल्या, त्या कानावर घेण्याचीदेखील सरकारची इच्छा नाही, अशा शब्दांत आम आदमी पक्षाचे नेते सिद्धार्थ कारापूरकर यांनी सरकारवर टीका केली आहे. 

कारापूरकर म्हणतात की, ‘पैसा फेकणा-यांचे हितसंबंध जपण्यासाठी सरकारने पर्यावरणाच्या बाबतीत अनेक तडजोडी केल्याने आज राज्याला नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागत आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला, मात्र त्यामुळे उद्भवलेली पूरस्थिती याला सरकारचा पर्यावरणाकडे असलेला दृष्टिकोनच जबाबदार आहे. खरेतर पर्यावरण संतुलन राखणे हे सरकारचे काम आहे, मोठ्या प्रमाणात चाललेली डोंगरकापणी, सखल भाग, शेती मातीचा भराव टाकून बुजविण्याचे प्रकार, वृक्षांची बेसुमार कत्तल यामुळे पर्यावरणीय असंतुलन निर्माण झालेले आहे.ते पुढे म्हणतात की, ‘पर्यावरणतज्ज्ञ माधवराव गाडगीळ यांनी सरकारला काही वर्षांपूर्वी सरकारला महत्त्वाच्या सूचना केल्या होत्या, परंतु त्यांचे कोणीही कानावर घेतले नाही.  केरळमध्ये मागच्यावर्षी जी आपत्ती आली त्याचेही भाकित त्यांनी आधीच केले होते.’

‘साळावलीबाबत खरी माहिती द्या’

सरकारने साळावली धरणातील पाण्याच्या ख-या पातळीबाबत लोकांना सांगावे, असे आवाहन करताना कारापूरकर म्हणतात की, ‘धरण भरले व जादा पाणी सोडावे लागले, यामुळे प्रसारमाध्यमांना जुलैमध्येच चांगले चित्र मिळाले. इतिहासात डोकावताना धरणाच्या मागील नोंदींवरून असे दिसते की ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात साळावली धरण भरते व जादा पाणी सोडावे लागते. कारण खाणीतील माती वाहून आल्याने पाण्याची साठवणूक करण्यास अडथळा येतो. राज्यातील अनेक नद्यांची हीच परिस्थिती आहे. साळावली धरण ही दक्षिण गोव्याची जीवनरेखा आहे व या धरणाच्या बाबतीतही केवळ काही जणांच्या हितसंबंधांसाठी तडजोड केली जात आहे. सरकारे बदलत राहतात; परंतु भविष्यात गोमंतकीयांनाच त्याची गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे कारापूरकर यांनी शेवटी म्हटले आहे. 

टॅग्स :goaगोवा