Join us  

नायिकांच्या प्रेमात दिग्दर्शकांनी मोडला संसार

By admin | Published: September 17, 2015 2:34 AM

कोंकणा सेन शर्मा आणि रणबीर शौरी यांच्यातील वादाचा मुद्दा शांत होत नाही तोच आता कंगणाला घेऊन ‘क्वीन’ चित्रपट बनविणारे दिग्दर्शक विकास बहल हेदेखील आपल्या

कोंकणा सेन शर्मा आणि रणबीर शौरी यांच्यातील वादाचा मुद्दा शांत होत नाही तोच आता कंगणाला घेऊन ‘क्वीन’ चित्रपट बनविणारे दिग्दर्शक विकास बहल हेदेखील आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेत असल्याचे वृत्त आहे. कारण कोणत्यातरी अभिनेत्रीसोबत त्यांचे अफेअर सुरू असल्याच्या बातम्या येत आहेत. विकास बहल याबाबत काहीही बोलायला तयार नाहीत़ त्यामुळे हे वृत्त खरे आहे की काय, अशी शंका यायला लागली आहे. बहल यांच्यासारखेच अनेक दिग्दर्शक आहेत ज्यांनी नायिकांच्या प्रेमात पडून आपल्या चांगल्या संसाराची माती केली आहे. हिंदी चित्रपटाचे महान दिग्दर्शक गुरुदत्त आणि त्यांची गायिका, अभिनेत्री पत्नी गीता दत्त यांच्या घटस्फोटाला वहिदा रहेमान यांना कारणीभूत मानले जाते. हे जगजाहीर आहे की गुरुदत्त वहिदा रहेमानमुळे आयुष्यभर किती भावुक राहिले. शोलेचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांचेही नाव या यादीत आहे. त्यांना आपल्या पत्नीला घटस्फोट देत किरण जुनेजासोबत लग्न केले. आंतरराष्ट्रीय ख्याती मिळविलेले दिग्दर्शक शेखर कपूर यांनी तर दोन वेळा असा प्रकार केला आहे. पहिल्यांदा त्यांचे लग्न मेधा जलोटा यांच्यासोबत झाले. १९९४मध्ये त्यांच्यात घटस्फोट होऊन शेखर कपूर यांनी सुचित्रा कृष्णमूर्तीसोबत लग्न केले. काही वर्षांनी सुचित्रालाही घटस्फोट दिला. यश चोप्रा यांचे चिरंजीव आदित्य चोपडाचे लग्न पायलसोबत झाले. मात्र लवकरच त्यांच्यात वाद होऊन घटस्फोट झाला व आदित्यने राणी मुखर्जीसोबत लग्न केले. ‘जब वी मेट’फेम दिग्दर्शक इम्तियाज अली यांनीदेखील आपली पत्नी प्रीतीला घटस्फोट दिला आहे. सध्या ते एका अनिनेत्रीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. दिग्दर्शक प्रियदर्शन यांनीदेखील आपल्या पत्नीशी घटस्फोट घेतला आहे. त्यांचे नाव एका अभिनेत्रीसोबत जोडले जात आहे. महेश भट्ट हे यांनी पत्नी किरण (पूजा भट्टची आई) यांना घटस्फोट देऊन सोनी राजदान (अलिया भट्टची आई) सोबत लग्न केले. त्यांचे भाऊ विक्रम भट्ट यांनी पत्नीला घटस्फोट दिला व ते आता अमिषा पटेलचे झाले आहेत. मात्र पाच वर्षांनंतर त्यांचाही ब्रेकअप झाला. स्वनाम धन्य अनुराग कश्यप यांनी प्रथम आपली पत्नी आरतीला घटस्फोट दिला. कारण काल्की कोच्चयीन त्यांना आवडली होती. मात्र काही दिवसांत काल्कीसोबतही घटस्फोट झाला. ते हुमा खानच्या खूप जवळ असल्याची चर्चा आहे. ही मालिका येथेच संपत नाही. यामध्ये आणखी किती नावे जुडतील हेही सांगता येत नाही. मात्र हे नक्की की चित्रपटात काम करताना अभिनेत्रींसोबत दिग्दर्शक इतके जवळ आले की त्यांनी या प्रेमात संसारही उधळून लावला.

- anuj.alankar@lokmat.com