‘एक विलेन’मध्ये निगेटिव्ह भूमिका साकारणारा रितेश देशमुख अडल्ट कॉमेडी चित्रपटांना कंटाळला आहे. त्यामुळेच आता असे चित्रपट करणार नाही, असे त्याने म्हटले आहे. त्यामुळेच निर्माती एकता कपूर नाराज आहे. ‘क्या कुल है’ हमच्या तिस:या भागात काम करायला रितेशने नकार दिल्याने ती नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘एक विलेन’ या चित्रपटाने 1क्क् कोटींचा व्यवसाय केला आहे, तर त्याचा ‘लय भारी’ हा मराठी चित्रपट सुपरहिट ठरला असून चांगली कमाई करीत आहे. रितेशने एकताला अद्याप सरळ नकार दिलेला नाही, पण चित्रपटावर चर्चा करण्यासाठीही तो वेळ देत नसल्याचे एकताला वाईट वाटत आहे.