बाई वाड्यावर या... या गाण्याने प्रेक्षकांमध्ये यापूर्वीच धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे ‘जलसा’ या सिनेमााची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. आता प्रेक्षकांना फक्त २१ आॅक्टोबरपर्यंत या सिनेमाची वाट पाहावी लागणार आहे. आशुतोष राज दिग्दर्शित ‘जलसा’ हा विनोदी सिनेमा आहे. या सिनेमाात गिरिजा जोशी, निखिल वैरागर, शीतल अहिरराव या कलाकारांचा समावेश आहे; तसेच या सिनेमाात कॉमेडीचे बादशाह असणारे भारत गणेशपुरे, सागर कारंडे, अभिजित चव्हाण, अरुण कदम यांचाही समावेश असल्यामुळे हा सिनेमा नक्कीच धम्माल उडवून देईल यात काही शंका नाही. स्टुडिओ ९ एंटरटेनमेंटची निर्मिती असलेला ‘जलसा’ हा सिनेमा आहे.
‘जलसा’ २१ आॅक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला
By admin | Updated: October 17, 2016 02:13 IST