२०२३ मध्ये सरकारनं २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. सरकारनं एकेकाळी जुन्या ५०० आणि १००० च्या नोटा बंद केल्या होत्या, पण सरकार आता ५०० रुपयांच्या नोटा बंद करणार आहे का? सरकार मार्च २०२६ पर्यंत ५०० रुपयांच्या नोटांवर बंदी घालणार असल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशा परिस्थितीत हे खरं आहे का? चला जाणून घेऊया.
५०० रुपयांच्या नोटा बंद होणार?
एका यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यामध्ये आरबीआय मार्च २०२६ पर्यंत ५०० रुपयांच्या नोटा रद्द करण्याची योजना आखत असल्याचं सांगण्यात आलंय. हा व्हिडिओ ११ मिनिटांचा आहे, जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे, परंतु या व्हिडिओमध्ये जी माहिती सांगितली जात आहे ती खोटी आहे. यावर सरकारनंही स्पष्टीकरण देत यात नसल्याचं म्हटलंय.
८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीचे Jio चे हे तीन प्लान्स आहेत बेस्ट; किंमत १००० रुपयांपेक्षाही कमी
पीआयबीनं सांगितलं सत्य
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. ५०० रुपयांच्या नोटा बंद होण्याची माहिती खोटी आहे आणि आरबीआय ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर काढणार नाही. ५०० रुपयांच्या नोटा वैध असून ही फेक न्यूज आहे.
कॅपिटल टीव्हीनं हा फेक व्हिडिओ पोस्ट केला असून, ५०० रुपयांची नोट बंद झाल्याची खोटी माहिती देण्यात आली आहे. दुसरीकडे, आरबीआयनं सादर केलेल्या रिपोर्टनुसार आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ५०० रुपयांच्या बनावट नोटांच्या संख्येत ३७.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.