बँकिंग क्षेत्रात शिस्त राखण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं (RBI) गेल्या एका वर्षात (जुलै २०२४ ते जुलै २०२५ पर्यंत) एकूण १२ सहकारी बँकांचे परवाने रद्द केले आहेत. यापैकी बहुतेक लहान शहरी सहकारी बँका आहेत, ज्या त्यांच्या कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे आणि नियमांचे पालन करण्यास असमर्थ असल्यानं बंद पडल्या. कोणत्या बँकांवर रिझर्व्ह बँकेनं कारवाई केली त्याची यादी जाणून घेऊ.
१. बनारस मर्कन्टाइल को-ऑपरेटिव्ह बँक वाराणसी, उत्तर प्रदेश जुलै २०२४२. सिटी को-ऑपरेटिव्ह बँक मुंबई, महाराष्ट्र २०२४३. पूर्वांचल सहकारी बँक गाजीपुर, उत्तर प्रदेश २०२४४ .सुमेरपुर मर्कंटाइल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक राजस्थान २०२४५. जय प्रकाश नारायण नागरी सहकारी बँक बिहार २०२४६. श्री महालक्ष्मी मर्कन्टाइल को-ऑपरेटिव्ह बँक, तमिळनाडू २०२४७. हिरियुर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक कर्नाटक २०२४८. अंजना अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक औरंगाबाद, महाराष्ट्र २२ एप्रिल २०२५९. कलर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक अहमदाबाद, गुजरात १६ एप्रिल २०२५१०. इंपीरियल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक जालंधर, पंजाब २५ एप्रिल २०२५११. शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक अकलूज, महाराष्ट्र ११ एप्रिल २०२५१२. कारवार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक कर्नाटक २२ जुलै २०२५
२०२४ मध्ये बंद झालेल्या ७ बँकांपैकी बहुतेक बँका जानेवारी-जुलै २०२४ दरम्यान बंद झाल्या. एप्रिल २०२५ मध्ये ४ बँका बंद झाल्या आणि जुलै २०२५ मध्ये कारवार बँकेचा परवाना रद्द करण्यात आला.
ग्राहकांचे पैसे किती सुरक्षित?
DICGC विमा: प्रत्येक ठेवीदाराला DICGC (ठेवींचा विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन) कडून जास्तीत जास्त ₹५ लाख परत मिळतात, मग ते बचत, चालू किंवा एफडी खात्यात असो.
कारवार बँकेचं उदाहरण: या बँकेत ९२.९% खातेधारकांकडे ५ लाखांपेक्षा कमी ठेवी होत्या, त्यामुळे त्यांना पूर्ण रक्कम मिळेल. डीआयसीजीसीनं आधीच ₹३७.७९ कोटी दिले आहेत.
इशारा: जर तुमच्या खात्यात ₹५ लाखांपेक्षा जास्त रक्कम असेल, तर उर्वरित पैसे गमावले जाऊ शकतात. म्हणून, आरबीआय सल्ला देते की बँक निवडताना, तिची आर्थिक स्थिती तपासली पाहिजे.