Join us  

Coronavirus: लॉकडाऊन वाढवणं अर्थव्यवस्थेसाठी आत्मघातकी ठरेल- आनंद महिंद्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 8:16 AM

पण जर यात आणखी वाढ केली तर समाजाच्या (गोरगरीब आणि गरजू) खालच्या स्तरातील वर्गाला गंभीर समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. 

मुंबई- कोरोनानं जगभरात थैमान घातलं असून, त्याला थोपवण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतातही लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू असून, १७ मेनंतर पुढे लॉकडाऊन वाढणार का?, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. विशेष म्हणजे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीसुद्धा लॉकडाऊनवर भाष्य केलं आहे. लॉकडाऊन दीर्घ कालावधीसाठी वाढविण्यात आला तर देशाचं मोठं आर्थिक नुकसान होणार असून, अर्थव्यवस्थेसाठी ते आत्मघातकी पाऊल ठरेल, असंही आनंद महिंद्रा म्हणाले आहेत. महिंद्रा समूहाचे अध्यक्ष म्हणाले की, लॉकडाऊनने लाखो लोकांचे प्राण वाचवले आहेत, पण जर यात आणखी वाढ केली तर समाजाच्या (गोरगरीब आणि गरजू) खालच्या स्तरातील वर्गाला गंभीर समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. पण याचा अर्थ लॉकडाऊनने काहीही मदत झाली नाही, असा नाही. महिंद्रा म्हणाले की, भारताने आपल्या कोरोना युद्धात कोट्यवधी संभाव्य मृत्यू टाळले आहेत. लॉकडाऊन दीर्घकाळ राहिल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धोका आहे. वाढत्या धोक्यापासून अर्थव्यवस्थेला वाचवण्याची गरज असून, रुग्णालयातील ऑक्सिजन, पीपीई कीट सारखं सामान मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणं गरजेचं आहे. तसेच सामाजिक अंतराचं पालन करणंही आवश्यक आहे, असंसुद्धा आनंद महिंद्रा म्हणाले आहेत.  

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस