Join us
Daily Top 2Weekly Top 5

अरब देशांमध्ये युद्धाची भीती, लाखो रुपयांच्या नोकऱ्या सोडून भारतीय परतीच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 17:16 IST

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे तिथे काम करणाऱ्या भारतीयांची चिंता वाढली आहे. एकेकाळी करिअरसाठी सुरक्षित आश्रयस्थान मानल्या जाणाऱ्या मध्य पूर्वेतून लोक आता मायदेशी परतत आहेत. भारतात नोकरी शोधणाऱ्यांची संख्या ३०% ने वाढली आहे.

आखाती देशांमध्ये वाढत चाललेल्या युद्ध संकटामुळे तेथे काम करणाऱ्या भारतीयांच्या चिंता वाढल्या आहेत. दशकांपासून, करिअर आणि उज्ज्वल भविष्यासाठी जगातील सर्वात सुरक्षित ठिकाण मानले जाणारे मध्य पूर्व आता धोक्यात आहे. 

मागील काही दिवसांपासून आखाती देशांमध्ये युद्ध संकट सुरू आहे. अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर इराणने आखाती अनेक देशांवर हल्ले केले. या आखाती देशात काम करणारे या संकटामुळे चिंता वाढल्या आहेत. दशकांपासून, करिअर आणि उज्ज्वल भविष्यासाठी जगातील सर्वात सुरक्षित ठिकाण मानले जाणारे मध्य पूर्व आता धोक्यात आहे. या अडचणीमुळे भारतीय नागरिक पुन्हा भारतात नोकरी मिळण्याच्या प्रयत्नात आहेत. 

काही दिवसांपासून सुरू असलेल्या भू-राजकीय उलथापालथीमुळे मध्य पूर्वेची एकेकाळी शांत आणि स्थिर असलेली प्रतिमा पूर्णपणे बदलली आहे. देशातील आघाडीच्या कार्यकारी शोध कंपन्यांच्या आकडेवारीवरून या महत्त्वपूर्ण बदलाची स्पष्टपणे साक्ष मिळते. गेल्या काही दिवसांत, भारतात नोकरी शोधणाऱ्या आखाती देशांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या चौकशीत २५ ते ३० टक्क्यांनी लक्षणीय वाढ झाली आहे.

तज्ज्ञांच्या मते, सध्याच्या युद्धाने मध्य पूर्व 'सुरक्षित आश्रयस्थान' आहे ही मिथक मोडून काढली आहे. लोक आता स्वतःच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेशी तडजोड करण्यास तयार नाहीत. अनेक जण आता पुन्हा एकदा मायदेशात नोकरी करण्यास इच्छुक आहेत.

कतारपासून दुबईपर्यंत भीतीचे सावट

मिळालेल्या माहितीनुसार, भीती आणि अनिश्चिततेचे वातावरण फक्त एकाच देशापुरते मर्यादित नाही. कतारमधील एका बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनीत काम करणाऱ्या मध्यम-स्तरीय व्यावसायिकांनी भारतात नोकरी शोधण्यास सुरुवात केली आहे, कारण भारतातील त्यांचे वृद्ध पालक तेथील परिस्थितीमुळे खूप चिंतेत आहेत. दुबईमध्ये राहणारी अनेक कुटुंबे देखील गोंधळलेल्या स्थितीत आहेत. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्यासाठी आणि बाल्कनी आणि खिडक्यांपासून दूर राहण्याचे वारंवार अलर्ट पाठवले जात आहेत.

टॅग्स :नोकरीदुबईअमेरिका-इस्रायल-इराण वॉर