चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेसाठी देशाच्या दिलासादायक बातमी आहे. १ एप्रिल ते १७ डिसेंबर या कालावधीत भारताच्या प्रत्यक्ष करसंकलनात ८ टक्क्यांची वाढ झाली असून, एकूण महसूल १७.०४ लाख कोटी रुपये इतका झाला आहे. विशेष म्हणजे, यंदा रिफंड प्रक्रिया संथ राहिल्यानं निव्वळ करसंकलनाचा आकडा उंचावलेला दिसत आहे.
या १७.०४ लाख कोटींच्या महसुलात कॉर्पोरेट कराचा वाटा ८.१७ लाख कोटी रुपये तर वैयक्तिक आयकर आणि इतर करांमधून ८.४७ लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. शेअर बाजारातील वाढत्या उलाढालीचं प्रतिबिंबही सरकारी तिजोरीत उमटलं असून, शेअर बाजारातील कराद्वारे (एसटीटी) सरकारला ४०,१९५ कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याची माहिती आयकर खात्यानं शुक्रवारी दिली.
संकलनात ४ टक्के वृद्धी
रिफंड देण्याच्या प्रमाणात गेल्या वर्षीच्या तुलनेत १४ टक्क्यांची घट झाली आहे. सरकारनं १७ डिसेंबरपर्यंत २.९७ लाख कोटी रुपयांचा रिफंड जारी केला. तर प्रत्यक्ष कर संकलनात २०.०१ लाख कोटींनी (४.१६ टक्के वाढ) झाली आहे.
लक्ष्याकडे वाटचाल
सरकारनं २०२५-२६ साठी २५.२० लाख कोटी रुपयांच्या प्रत्यक्ष करसंकलनाचं उद्दिष्ट ठेवलं आहे. यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
Web Summary : India's direct tax collection surged 8% to ₹17.04 lakh crore this fiscal year. Corporate and personal income tax contributed significantly. Reduced refunds boosted net collection. Government aims for ₹25.20 lakh crore tax collection by 2025-26.
Web Summary : भारत का प्रत्यक्ष कर संग्रह इस वित्त वर्ष में 8% बढ़कर ₹17.04 लाख करोड़ हो गया। कॉर्पोरेट और व्यक्तिगत आयकर का महत्वपूर्ण योगदान रहा। कम रिफंड से शुद्ध संग्रह बढ़ा। सरकार का लक्ष्य 2025-26 तक ₹25.20 लाख करोड़ कर संग्रह करना है।