Rs 100 and 200 Notes: केंद्र सरकारने नोटबंदीनंतर ५०० आणि २००० च्या नोटा काढल्या होत्या. पण, काही महिन्यांपूर्वीच २००० च्या नोटाही बंद करण्यात आल्या. त्यामुळे तुम्ही जेव्हा ATM मधून पैसे काढता, तेव्हा अनेकदा ५०० रुपयांच्याच नोटा बाहेर येतात. अनेकदा लोक या मोठ्या नोटांबद्दल तक्रार करतात. परंतु अलीकडेच, रिझर्व्ह बँकेने ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत सर्व एटीएममधीस किमान एका कॅसेटमधून १०० किंवा २०० रुपयांच्या नोटा वितरित करणे बंधनकारक केले आहे.
या नियमाशी संबंधित अंतिम मुदत पूर्ण होण्यासाठी बँकांकडे अद्याप तीन महिन्यांहून अधिक काळ शिल्लक आहे. पण, बँकांनी आतापर्यंत ठरवलेल्या लक्ष्याच्या ७३% लक्य पूर्ण केले आहे. सीएमएस इन्फोसिस्टम्सच्या डेटावरून असे दिसून येते की, बँकांनी ही प्रक्रिया वेगाने पूर्ण केली आहे. सीएमएस इन्फोसिस्टम्स देशातील २,१५,००० एटीएमपैकी ७३,००० एटीएम व्यवस्थापित करते. डिसेंबर २०२४ च्या अखेरीस त्यांच्या नेटवर्कमधील ६५% एटीएममधून लहान नोटा मिळत होत्या, परंतु आता हा आकडा ७३% पर्यंत वाढला आहे.
६०% लोक रोखीने खर्च करतात
सीएमएस इन्फोसिस्टम्सचे अध्यक्ष अनुश राघवन म्हणाले की, ६०% लोक अजूनही त्यांच्या दैनंदिन गरजा रोखीनेच पूर्ण करतात. विशेषतः लहान शहरे आणि गावांमध्ये, १०० ते २०० रुपयांच्या नोटा लहान व्यवहारांसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. या नोटांची उपलब्धता वाढल्याने लोकांसाठी दैनंदिन कामे सोपी होतील. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत ७५% एटीएममध्ये १०० आणि २०० रुपयांच्या लहान नोटा असाव्यात. तर, ३१ मार्च २०२६ पर्यंत ९०% एटीएममध्ये लहान नोटा देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.