Mumbai Train Update : सलग तिसऱ्या दिवशी मध्य रेल्वेचा खोळंबा, प्रवाशांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 09:12 AM2019-06-12T09:12:17+5:302019-06-12T09:14:52+5:30

सलग तिसऱ्या दिवशी मध्य रेल्वेचा खोळंबा झाला आहे. ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक बुधवारी (12 जून) विस्कळीत झाली आहे.

Mumbai Train Update central railway traffic disrupted 12 june | Mumbai Train Update : सलग तिसऱ्या दिवशी मध्य रेल्वेचा खोळंबा, प्रवाशांचे हाल

Mumbai Train Update : सलग तिसऱ्या दिवशी मध्य रेल्वेचा खोळंबा, प्रवाशांचे हाल

googlenewsNext
ठळक मुद्देसलग तिसऱ्या दिवशी मध्य रेल्वेचा खोळंबा झाला आहे. ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक बुधवारी (12 जून) विस्कळीत झाली आहे. कल्याणहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहे.

मुंबई - सलग तिसऱ्या दिवशी मध्य रेल्वेचा खोळंबा झाला आहे. ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक बुधवारी (12 जून) विस्कळीत झाली आहे. कल्याणहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी त्रासाला सामोर जावं लागल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याणहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांवर परिणाम झाल्याने कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकांमध्ये सध्या प्रचंड गर्दी आहे. याआधी मंगळवारी (11 जून) सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने दिवा ते ठाणे स्थानकादरम्यान लोकल 15 ते 20 मिनिटे थांबल्या होत्या. त्यामुळे वाहतूक उशिराने सुरू होती. तर सोमवारी (10 जून) पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. 


मध्य रेल्वेवरील खडवली रेल्वे स्थानकाजवळ गुरुवारी (6 जून) रुळाला तडे गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे लोकल सेवा तब्बल 35 ते 40 मिनिटे उशिराने धावत होत्या. याआधी बुधवारी (5 जून) देखील मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. डोंबिवली स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळविण्यात आली होती. तसेच मध्य रेल्वेच्या गाड्या 20 ते 25 मिनिटे उशीराने धावत होत्या. कल्याण, डोंबिवलीहून दररोज हजारो प्रवासी सीएसएमटीच्या दिशेने प्रवास करतात. आज जवळपास 20 मिनिटे लोकल उशिराने सुरू असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

मध्य रेल्वे मार्गावर 79 पंप उपसणार पावसाचे पाणी! पाणी साचू नये म्हणून उपाययोजना सुरू

दरवर्षी थोडा पाऊस पडला तरी रेल्वे रुळावर पाणी साचून लोकल सेवा विस्कळीत होते. दरवर्षीच्या या रडगाण्याची यंदा पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने मान्सूनची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी साचू नये, यासाठी मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरील स्थानकांत एकूण 79 पंप मशीन बसविण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मध्य रेल्वे मार्गावर पाणी तुंबण्याची समस्या होते. सहा ठिकाणी जास्त प्रमाणात पाणी तुंबते. या भागातून पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप मशीनच्या संख्येत वाढ केली आहे, अशी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. पावसाळ्यात मोठा पाऊस पडल्यास रेल्वेचा वेग मंदावतो. त्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक पूर्णत: कोलमडून जाते. परिणामी, प्रवाशांना पायपीट करत इच्छितस्थळी पोहोचावे लागते. वादळवारा आणि पाऊस पडल्यामुळे झाडे पडण्याच्या घटना, सिग्नल बिघाड, ओव्हरहेड वायर तुटणे अशा घटना घडतात. त्यामुळे मान्सूनपूर्व काळात रेल्वे हद्दीतील झाडांच्या फांद्यांची छाटणी करणे, नालेसफाई, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरची दुरुस्ती करणे, रेल्वे रुळांची स्वच्छता करणे, रेल्वे मार्गात येणाऱ्या लोखंडी वस्तूंना गंजरोधक रंग लावणे अशी कामे सध्या सुरू आहेत. एप्रिलपासून सुरू केलेली कामे मे अखेरीपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मध्य रेल्वे प्रशासनाने ठेवले असून आतापर्यंत 70 ते 80 टक्के कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

 

Web Title: Mumbai Train Update central railway traffic disrupted 12 june

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.