एअर इंडियाच्या विमानामुळे चार तास झाला प्रवाशांचा खोळंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2017 06:45 PM2017-08-05T18:45:14+5:302017-08-05T18:53:24+5:30

एअर इंडियाच्या एआय 809 विमानाने दिल्लीला जाणा-या प्रवाशांचे शनिवारी चांगलेच हाल झाले.

Due to the deterioration of the Air India pilot stuck in the plane | एअर इंडियाच्या विमानामुळे चार तास झाला प्रवाशांचा खोळंबा

एअर इंडियाच्या विमानामुळे चार तास झाला प्रवाशांचा खोळंबा

googlenewsNext

मुंबई, दि. 5 - एअर इंडियाच्या एआय 809 विमानाने मुंबईहून दिल्लीला जाणा-या प्रवाशांचे शनिवारी चांगलेच हाल झाले. विमानात तांत्रिक बिघाड उदभवल्याने प्रवासी तीन ते चार तासांसाठी विमानात अडकून पडले होते. यावेळी विमानातील एअर कंडिशनिंगची यंत्रणाही बंद असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. विमानातील प्रवाशांनीच ही माहिती दिली. 

शनिवारी दुपारी ही घटना घडली. मुंबई-दिल्ली-जेद्दाह विमानाला नेमका का विलंब झाला. त्याची काय कारणे आहेत हे शोधण्यासाठी आम्ही चौकशी समिती स्थापन केली आहे असे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले. 
 

Web Title: Due to the deterioration of the Air India pilot stuck in the plane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.